शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नावर नागरिकांनी सुचविले विविध उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 14:15 IST

क्रांतीचौकातील स्वातंत्र्य संग्राम स्मारक परिसरात एकत्र आलेल्या नागरिकांनी भविष्यातील कचरा प्रश्नावर विविध उपाय सुचविले.

ठळक मुद्देनारेगाव येथील परिस्थितीने औरंगाबाद शहर गेल्या १७ दिवसांपासून कचराकोंडीत आहे. हा प्रश्न आज ना उद्या सुटेल; परंतु भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद््भवणारच नाही, यासाठी प्रत्येक नागरिकाने यात महत्त्वाचा वाटा घ्यावा ही भूमिका

औरंगाबाद : नारेगाव येथील परिस्थितीने औरंगाबाद शहर गेल्या १७ दिवसांपासून कचराकोंडीत आहे. हा प्रश्न आज ना उद्या सुटेल; परंतु भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद््भवणारच नाही, यासाठी प्रत्येक नागरिकाचा वाटा महत्त्वाचा आहे. ही भूमिका लक्षात घेऊन रविवारी (दि.४) क्रांतीचौकातील स्वातंत्र्य संग्राम स्मारक परिसरात एकत्र आलेल्या नागरिकांनी भविष्यातील कचरा प्रश्नावर विविध उपाय सुचविले.

याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन, नगसेवक राजू वैद्य, सुरेंद्र कुलकर्णी, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, सारंग टाकळकर, श्रीकांत उमरीकर, श्रीपाद टाकळकर, निवृत्त पोलीस अधिकारी नरेश मेघराजानी, डॉ. रश्मी बोरीकर, शीतल रुद्रवार, आशा कोरान्ने, सुमित खांबेकर, समीर राजूरकर, डॉ. राघवेंद्र अष्टपुत्रे, हेमंत अष्टपुत्रे, मोहिंदर बाकरिया, गौरी पांडे, सुशांत पांडे, शरद लासूरकर, माधुरी लासूरकर, चंद्रकांत ढुमणे, आकाश ढुमणे, रवींद्र पाठक, अ‍ॅड. सचिन सुदामे, अनिल विधाते आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

असे सुचवले उपाय - प्रत्येक वॉर्डात ओला कचरा जिरविण्यास प्राधान्य द्यावे.- कचरावेचकांना एकत्र करून त्यांना ओळखपत्र देणे, त्यांची मदत घेणे.- वार्डातील नागरिकांची मदत घेऊन कचरा प्रश्न हाताळणे.- ओल्या कचर्‍यापासून घरातच खत निर्मिती क रण्यात यावी.- ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस तयार करून घरात वापरावा.- मोठ्या संस्था, प्रकल्प, सोसायटी, रुग्णालयांनी स्वत:चा कचरा स्वत: जिरवावा.- पुण्यातील सारस बागप्रमाणे नारेगावात खत, बायोगॅस निर्मिती करणे.- ‘पोलीस मित्र’प्रमाणे स्वच्छता मित्र तयार करणे.- शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका