शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विविध आंब्यांचा बाजारात दरवळ, पण आमरस खवय्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 4, 2024 18:06 IST

अजूनही मोठा वर्ग असा आहे, जो अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवासमोर आंब्याचा नैवेद्य दाखवून नंतरच आमरस खाण्यास सुरुवात करतात.

छत्रपती संभाजीनगर : विविध आंब्यांचा दरवळ बाजारात पसरू लागला आहे. काहींनी महिनाभर आधीपासूनच आंबे खाण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही अनेक ग्राहक असे आहेत की, ते अक्षय्य तृतीयेपासून आमरस खाण्यास सुरुवात करतात. मात्र, यास आणखी महिनाभराचा अवधी बाकी आहे. तोपर्यंत खवय्यांना उत्तम आंब्यांची प्रतीक्षा आहे.

साधारणत: फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात आंब्यांचे आगमन होते. ज्या किमतीत आंब्याची पहिली पेटी मिळेल त्या भावात खरेदी करणाऱ्या खवय्यांची संख्या शहरात कमी नाही. जसजसे आंबे बाजारात उपलब्ध होऊ लागले तसतसे रसाळी सुरू झाली आहे. चार ते पाच चवीचे आंबे बाजारात असून भावही आवाक्यात असल्याने आंब्यांची विक्री वाढली आहे. मात्र, अजूनही मोठा वर्ग असा आहे, जो अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवासमोर आंब्याचा नैवेद्य दाखवून नंतरच आमरस खाण्यास सुरुवात करतात.

४४ दिवस मनसोक्त आंब्यावर मारा तावअनेक कुटुंबांत परंपरा आहे की, अक्षय्य तृतीयेला आमरस खाण्यास सुरुवात करतात व वटपौर्णिमेनंतर आंबे खाण्यास बंद करतात. १० मे रोजी अकय्य्य तृतीया व २१ जूनला वटपौर्णिमा आहे. ४४ दिवस हे खवय्ये आंब्यावर मनसोक्त मारू शकतात. मात्र, या खवय्यांना आणखी महिनाभर आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.

कोणते आंबे बाजारातरमजान महिना सुरू असून रोजे (उपवास) सोडण्यासाठी आमरस खाल्ला जातो. यामुळे आंब्यांना मोठी मागणी आहे. बाजारात बदाम, केशर, लालबाग, मलाईका व हापूस असे पाच जातीचे आंबे सध्या बाजारात विकले जात आहे. केशर आंबा कर्नाटक राज्यातून येत आहे. आपल्याकडील अस्सल केशर आंबा मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजारात दाखल होईल.

काय भावात मिळतोय आंबाप्रकार भाव१) बदाम १२०-१५० रु२) केशर १८०-२००रु३) लालबाग १००-१२०रु४) मलाइका १५०-१६०रु

हापूस आंब्याचा भाव उतरलासध्या बाजारात रत्नागिरी, देवगड तसेच कर्नाटक, हैदाबाद येथून हापूस आंबा विक्रीला येत आहे. अस्सल खवय्येच रत्नागिरी व देवगडचे आंबे ओळखू शकतात. १० दिवसांपूर्वी ९०० ते १२०० रुपये प्रति डझनने विक्री होणारा हापूसची आवक वाढताच भाव कमी होऊन सध्या ६५० ते १ हजार रुपये प्रति डझन विकत आहे.

टॅग्स :MangoआंबाAurangabadऔरंगाबादMarketबाजार