शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनवृद्धीसाठी विविध महोत्सव

By admin | Updated: October 10, 2014 00:42 IST

औरंगाबाद : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उत्सव- महोत्सवांचे आयोजन करण्याचा संकल्प राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये पर्यटन व्यवसायाला मोठा वाव आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उत्सव- महोत्सवांचे आयोजन करण्याचा संकल्प राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला आहे. आपल्या ‘व्हिजन औरंगाबाद’ या जाहीरनाम्यात राजेंद्र दर्डा यांनी पर्यटन विकासासाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यातील अजिंठा- वेरूळ या पर्यटनस्थळांसह शहरातील बीबी का मकबरा, पाणचक्की, देवगिरी किल्ला आदी पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी देश- विदेशातून पर्यटक येतात. या पर्यटकांना योग्य त्या सुविधा आणि नावीन्यपूर्ण कार्यक्रम दिल्यास त्यांची संख्या वाढविणे शक्य होईल. त्यासाठी ‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये औरंगाबाद दर्शन बस सुरू करण्यापासून ते ऐतिहासिक स्थळांच्या सौंदर्यीकरणापर्यंत अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून झालेला विकास उल्लेखनीय आहे़ त्यामुळे देशी, तसेच परदेशी पर्यटकांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे़ राजेंद्र दर्डा हे पर्यटन राज्यमंत्री असताना त्यांनी १८७ कोटी रुपयांचा निधी अजिंठा आणि वेरूळच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला होता़ त्यामुळे आज या पर्यटनस्थळांनी जागतिक दर्जा प्राप्त केला आहे़ शहरातील कलाग्राम ही राजेंद्र दर्डा यांच्याच संकल्पनेतून साकारलेली एक अप्रतिम अशी वास्तू आहे, ज्यामुळे पर्यटन विकासासह स्थानिक कलाकारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यासोबतच त्यांनी शहरातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिल्याने औरंगाबादची पर्यटनस्थळे आकर्षण बनली आहेत. पर्यटकांच्या या आकर्षणाला पर्यटन विकासात परावर्तित करण्यासाठी ‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये मांडण्यात आलेल्या संकल्पना अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. पर्यटन विकासाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, शहराचे सौंदर्यीकरण आणि औरंगाबादला जागतिक ओळख निर्माण करून देण्याचा उद्देश समोर ठेवून हे व्हिजन बनविण्यात आल्याचे राजेंद्र दर्डा यांनी स्पष्ट केले. यासाठी औरंगाबादच्या नागरिकांनी सुचविलेल्या महत्त्वपूर्ण कल्पनांचा आधार घेतला असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.