शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हिंदुस्तान आवास योजना वसाहतीत विविध नागरी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहरालगतच्या हिंदुस्तान आवास योजना वसाहतीत रस्ते, वीज, पाणी यासारख्या नागरी मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. ना धड ...

औरंगाबाद : शहरालगतच्या हिंदुस्तान आवास योजना वसाहतीत रस्ते, वीज, पाणी यासारख्या नागरी मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. ना धड रस्ते, ना सुरळीत वीज पुरवठा, ना पिण्याच्या पाण्याचा पत्ता अशी गत याठिकाणी बघायला मिळते.

या वसाहतीत विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार व्यत्यय येत आहे. पावसाळ्यात तर साप निघत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. लोकवस्ती वाढल्याने पथदीपांची संख्याही वाढणे गरजेचे आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अध्ययनामध्ये मोठा व्यत्यय येतो.

या वसाहतींमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी लाखो रुपये खर्चून जलकुंभ बांधला खरा पण या जलकुंभाला दीड दशकापासून पाण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नागरिकांना सामूहिक पद्धतीने कूपनलिका घेऊन तेच पाणी शुद्ध करून पिण्याशिवाय पर्याय नाही. महानगरपालिकेचे पिण्याच्या पाण्याचे टँकरसुद्धा येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

वाल्मी नाका ते बजाज गेट या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. या वसाहतींमधून कामगार वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये ये-जा करत असतात. परंतु, खड्डेमय रस्त्याचे विघ्न मात्र काही सुटत नाही. मोठमोठ्या खाच-खळग्यातूनच नागरिकांच्या वाहनांची आदळआपट होत आहे. शिवाय या रस्त्यावरुन दिवस-रात्र अवजड वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असते. मुख्य पाईपलाईनला नेहमीच गळती लागत असल्याने शेतात पाणीच पाणी साचत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.