शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

हिंदुस्तान आवास योजना वसाहतीत विविध नागरी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहरालगतच्या हिंदुस्तान आवास योजना वसाहतीत रस्ते, वीज, पाणी यासारख्या नागरी मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. ना धड ...

औरंगाबाद : शहरालगतच्या हिंदुस्तान आवास योजना वसाहतीत रस्ते, वीज, पाणी यासारख्या नागरी मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. ना धड रस्ते, ना सुरळीत वीज पुरवठा, ना पिण्याच्या पाण्याचा पत्ता अशी गत याठिकाणी बघायला मिळते.

या वसाहतीत विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार व्यत्यय येत आहे. पावसाळ्यात तर साप निघत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. लोकवस्ती वाढल्याने पथदीपांची संख्याही वाढणे गरजेचे आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अध्ययनामध्ये मोठा व्यत्यय येतो.

या वसाहतींमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी लाखो रुपये खर्चून जलकुंभ बांधला खरा पण या जलकुंभाला दीड दशकापासून पाण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नागरिकांना सामूहिक पद्धतीने कूपनलिका घेऊन तेच पाणी शुद्ध करून पिण्याशिवाय पर्याय नाही. महानगरपालिकेचे पिण्याच्या पाण्याचे टँकरसुद्धा येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

वाल्मी नाका ते बजाज गेट या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. या वसाहतींमधून कामगार वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये ये-जा करत असतात. परंतु, खड्डेमय रस्त्याचे विघ्न मात्र काही सुटत नाही. मोठमोठ्या खाच-खळग्यातूनच नागरिकांच्या वाहनांची आदळआपट होत आहे. शिवाय या रस्त्यावरुन दिवस-रात्र अवजड वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असते. मुख्य पाईपलाईनला नेहमीच गळती लागत असल्याने शेतात पाणीच पाणी साचत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.