शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरी प्रकल्पात ११ दलघमी पाणी

By admin | Updated: August 8, 2014 00:33 IST

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याची आवक होत नसल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे़

नांदेड : अर्धापावसाळा संपला तरी विष्णूपुरी प्रकल्पात अद्याप वरील भागातून पाण्याची आवक होत नसल्यामुळे पुढील काळात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे़ प्रकल्पात सध्या ११ दलघमी पाणीसाठा असून हे पाणी अवघे तीन महिने पुरेल एवढेच आहे़ मराठवाड्यावर कोरड्या दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले आहे़ पाच नक्षत्र संपले असून सहावे आश्लेषा नक्षत्र सुरू आहे़ या सर्व नक्षत्रात समाधानकारक पाऊस न बरसल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ पावसाअभावी मराठवाड्यातील प्रमुख धरणांची स्थिती चिंताजनक आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात सध्या ११़४६ दलघमी साठा उपलब्ध असून हे पाणी नांदेडकरांना पुढील अडीच, तीन महिने पुरेल एवढेच आहे़ येणाऱ्या नक्षत्रात पावसाने साथ न दिल्यास दिवाळीपासून पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहणार आहे़ येणाऱ्या मघा, पूर्वा, हस्त या तीन नक्षत्रावरच आता मदार आहे़ १६ आॅगस्टपासून मघा या नक्षत्राला प्रारंभ होणार आहे़ मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडण्याची प्रतीक्षा आहे़ मात्र या नक्षत्रांनी हुलकावणी दिल्यास येणाऱ्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे़ मागील दोन वर्षापासून अल्पपावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन पावसाळ्यात तीन दिवसाआड पाणी सोडावे लागत आहे़ शहराला दोन दिवसाआड २५ क्युसेस पाणी सोडले जाते़ त्यामुळे पाण्याचा वापर नागरिकांना जपून करावा लागणार आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने मागील महिन्यात दिग्रस बंधाऱ्यातून १० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील साठा वाढला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत साधारणपणे १२० मि़ मी़ पाऊस झाला आहे़ जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव कोरडेच दिसत आहेत़ येणाऱ्या काळातील पाण्याचे संकट ओळखून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याची वेळ आली आहे़ महापालिकेला शहरात अनावश्यक पाणी वापरावर निर्बंध घालून पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पातील साठा राखीव ठेवावा लागणार आहे़ (प्रतिनिधी)