शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

विष्णूपुरी प्रकल्पात ११ दलघमी पाणी

By admin | Updated: August 8, 2014 00:33 IST

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याची आवक होत नसल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे़

नांदेड : अर्धापावसाळा संपला तरी विष्णूपुरी प्रकल्पात अद्याप वरील भागातून पाण्याची आवक होत नसल्यामुळे पुढील काळात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे़ प्रकल्पात सध्या ११ दलघमी पाणीसाठा असून हे पाणी अवघे तीन महिने पुरेल एवढेच आहे़ मराठवाड्यावर कोरड्या दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले आहे़ पाच नक्षत्र संपले असून सहावे आश्लेषा नक्षत्र सुरू आहे़ या सर्व नक्षत्रात समाधानकारक पाऊस न बरसल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ पावसाअभावी मराठवाड्यातील प्रमुख धरणांची स्थिती चिंताजनक आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात सध्या ११़४६ दलघमी साठा उपलब्ध असून हे पाणी नांदेडकरांना पुढील अडीच, तीन महिने पुरेल एवढेच आहे़ येणाऱ्या नक्षत्रात पावसाने साथ न दिल्यास दिवाळीपासून पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहणार आहे़ येणाऱ्या मघा, पूर्वा, हस्त या तीन नक्षत्रावरच आता मदार आहे़ १६ आॅगस्टपासून मघा या नक्षत्राला प्रारंभ होणार आहे़ मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडण्याची प्रतीक्षा आहे़ मात्र या नक्षत्रांनी हुलकावणी दिल्यास येणाऱ्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे़ मागील दोन वर्षापासून अल्पपावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन पावसाळ्यात तीन दिवसाआड पाणी सोडावे लागत आहे़ शहराला दोन दिवसाआड २५ क्युसेस पाणी सोडले जाते़ त्यामुळे पाण्याचा वापर नागरिकांना जपून करावा लागणार आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने मागील महिन्यात दिग्रस बंधाऱ्यातून १० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील साठा वाढला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत साधारणपणे १२० मि़ मी़ पाऊस झाला आहे़ जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव कोरडेच दिसत आहेत़ येणाऱ्या काळातील पाण्याचे संकट ओळखून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याची वेळ आली आहे़ महापालिकेला शहरात अनावश्यक पाणी वापरावर निर्बंध घालून पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पातील साठा राखीव ठेवावा लागणार आहे़ (प्रतिनिधी)