शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

वाशीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा

By admin | Updated: May 10, 2016 00:10 IST

वाशी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या बळीराजा परिवर्तन विकास आघाडीचा पॅनलचा दारूण पराभव करीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित

वाशी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या बळीराजा परिवर्तन विकास आघाडीचा पॅनलचा दारूण पराभव करीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीने सर्वच्या सर्व १७ उमेदवार विजयी झाले़ तर एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निघाला आहे़ सहाय्यक निबंधक कार्यालयात सोमवारी सकाळी मतमोजणीनंतर निकाल लागताच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केला़ भाजपा- शिवसेनेच्या पॅनलमधील एकही उमेदवार विजयी झाला नाही, हे विशेष!वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आ.राहूल मोटे व जि.प.सदस्य प्रशांत चेडे यांनी आघाडी केली होती. दोन्ही नेत्यांनी प्रथमत बाजार समितीची निवडणूक बिनविरोध काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यात त्यांना यश आले नाही. वाजवीपेक्षा जास्तीचा जागा शिवसेना-भाजपने मागितल्यामुळे निवडणूक लागली़ काँग्रेस पक्षाने ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ११ जागा अशी विभागणी करून उमेदवार उभा केले होते़ यात सोसायटी मतदार (ओबीसी) संघातून दगडू पंडित यांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित १७ जागांसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली होती.वाशी येथे सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी एम.एस.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीस प्रारंभ झाला़ यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुमार बारकुल यांची उपस्थिती होती़ हमाल मापाडी मतदार संघातून लक्ष्मण देवीदास घुले यांना १३ मते पडली तर त्यांची प्रतिस्पर्धी योगेश हरीदास कवडे यांना १२ मते मिळाली़ कवडे यांचा एक मताने पराभव झाला. व्यापारी मतदार संघातून विकास शिवाजीराव पवार यांना ३६, किरण नामदेव कागदे ३० मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी विकास सुंदर मोळवणे २३ व संजय प्रताप साळुंखे २१ मते पडली़ ग्रामपंचायत मतदार संघातून विकास जिवन आखाडे २३१, मनिष निळकंठ भराटे यांनी २३० मते मिळवून विजय मिळविला़ तर नितीन शिवाजी रणदिवे ९३, दिनकर शिंदे यांना केवळ ९५ मते मिळाली़ ग्रामपंचायत मतदार संघातून अ़जा़जमातीच्या मधून रामा यशवंत खंडागळे यांनी २३७ मते घेऊन विजय मिळविला़ त्यांनी अमोल सुरेश गाडे यांना धूळ चारली. इतर मागासवर्गीयामधून मायावती पांडुरंग घुले यांनी २३५ मते घेऊन विजय मिळविला़ तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय खवले यांना ९१ मते मिळाली. सोसायटी मतदार संघ (महिला) सुमित्रा ज्ञानोबा पाटील ३१२, मिना सुनिल सुकाळे ३१२ मते मिळवून विजयी झाल्या़ त्यांच्या प्रतिस्पर्धी सत्यभामा काशिनाथ गव्हाणे यांना ४७ तर मिनाबाई सुंदर माळी यांना ४५ मते मिळाली. भ.वि.जा.ज.मधून रत्नाकर नवनाथ मोराळे यांना ३१८ मते मिळाली त्यांनी राधेशाम बाबुदास बैरागी यांचा पराभव केला़ बैरागी यांना ४४ मतावर समाधाना मानावे लागले. इतर मागासवर्गियातून दगडू दादाराव पंडित यांची पूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. सोसायटीच्या सर्वसाधारण मतदार संघातून बिबिशन सुखदेव भराटे (३०४), प्रविण शिवाजी घोलप (२९३), सुनिल भिकाजी जाधवर (२८८), बिबिशन ज्ञानोबा खामकर (३०४), वसंत दादाराव मोरे (३०८), प्रकाश नामदेव मोेटे (३०४), रमेश उत्तमराव पाटील यांनी ३०५ अशी विक्रमी मते घेवून विरोधकांना धूळ चारली़ तर या मतदारसंघात महादेव बाबुराव चौधरी (५३), दिलीप कमलाकर गरड (४६), सचिन मच्छिंद्र इंगोले (४६), मच्छिंद्र पंढरी जाधवर (६२), रामहारी नामदेव मोटे (५५), पांडुरंग सयाजी उंदरे (३६) यांना पराभवाचा सामना करावा लागला़ (वार्ताहर) कार्यकर्त्यांनी केली गुलालाची उधळणनिकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला़ यावेळी आ. राहूल मोटे, जि.प.सदस्य प्रशांत चेडे, मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब चौधरी, रणजित मोटे, रा.कॉ.चे मच्छिंद्र कवडे, दिलीप घोलप, आबासाहेब सरवदे, रविकरण मोराळे, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नितीन चेडे, काँग्रेसचे उपाध्यक्ष शामराव शिंदे, नगरपंचायतीचे गटनेते नागनाथ नाईकवाडी, प्रसाद जोशी, विठ्ठल कवडे, किरण जगताप, रमेश नन्नवरे, अ‍ॅड.सुर्यंकांत सांडसे, संतोष कवडे, विकासोचे चेअरमन छगनराव मोळवणे, नगरसेवक सचिन येताळ, मकरंद शिंगनापुरे, पांडरंग कवडे, काकासाहेब मोरे आदी उपस्थित होते. यावेळी पोनि महानोर व त्यांच्या सहाकऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.राजकीय चित्र बदलण्याची शक्यतावाशी तालुक्याच्या राजकारणात बाजार समितीची निवडणुक काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येवून लढविली आहे़ त्यामुळे विरोधी शिवसेना-भाजपाचा पूर्णत: धुव्वा उडाला आहे़ या निवडणुकीतील विजयाच्या गणितामुळे तालुक्याच्या राजकारणाचे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे़