शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

श्रावणात वैशाख वणवा

By admin | Updated: August 23, 2015 00:03 IST

सोमनाथ खताळ , बीड पावसाने अखडता हात घेतल्यामुळे यावर्षीच्या श्रावण महिन्यावर दुष्काळाची छाया स्पष्ट दिसू लागली आहे. बीड तालुक्यातील कपीलधार,

सोमनाथ खताळ , बीडपावसाने अखडता हात घेतल्यामुळे यावर्षीच्या श्रावण महिन्यावर दुष्काळाची छाया स्पष्ट दिसू लागली आहे. बीड तालुक्यातील कपीलधार, पाटोद्याजवळील सौताडा याठिकाणीच धबधबे कोरडेठाक पडली आहेत. तर इतर शिवालये व विविध देवस्थाने तहानलेली आहेत. यामुळे पवित्र स्रान करण्याची संधी मिळणार नसल्याने भाविकांचा हिरमोड होत आहे.बीडमधील कंकालेश्वर, कपिलधार येथील मन्मथस्वामींचे मंदिर, पाटोदा तालुक्यातील सौताडा, गोरक्षनाथ टेकडी, परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आदी ठिकाणी नुसते देवस्थानच नाही तर प्रेक्षणीय स्थळे आहेत. परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्याने ना धबधब्यांना पाणी आले ना प्रेक्षणीय स्थळांमध्ये हिरवळ दिसते. त्यामुळे देवांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा हिरमोड होत आहे.‘वैद्यनाथा’ शेजारील तिर्थ कोरडेठाकबारा ज्योतीर्लींगापैकी एक असणारे परळी येथील प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी बारा महिने भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्यात भाविकांची थोडी गर्दी वाढते. येथे दर्शनासाठी जाण्यापूर्वी मंदिराच्या उजव्या बाजुला असणाऱ्या तिर्थात भाविक अंघोळ करायचे. परंतु येथे असणाऱ्या हरीहर, मार्तंडे आणि अमृतेश्वर या तीन तिर्थापैकी हरीहर व मार्तंडे हे दोन्ही तिर्थ कोरडेठाक पडले आहेत तर अमृतेश्वर मध्ये ओंजळभर पाणी आहे. याच पाण्यात हातपाय धुवून भाविक दर्शनाला जातात. दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाजुला असणाऱ्या मेरू पर्वतावर भाविक जात असत. येथून संपूर्ण शहराचे दर्शन घडते. परंतु पावसाअभावी येथील हिरवळ गायब झाली असून पर्यटकांसह भाविकांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसते.सौताड्यात गार्डन आहे पण पाणी नाहीसौताडा येथील धबधब्याचाही आनंद यावर्षी घेता आला नाही. या धबधब्यात पाणीच वाहिले नाही. तिसऱ्या सोमवारी रामेश्वर मंदिरात मोठी यात्रा भरते. सुमारे पाच लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात. महिनाभर ही यात्रा चालते. परंतु धबधब्यात पाणीच नसल्याने भाविकांसह पर्यटकांमध्ये उत्साह नाही.दीपमाळमधील सुशोभिकरण वाळलेबीड शहरातील खंडोबा मंदिर व दिपमाळीचे बांधकाम हे पुरातन आहे. येथेही भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सध्या या मंदिराची रंगरंगोटी सुरू आहे. पाणी नसल्याने परिसरातील गार्डन वाळले आहे.गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन येथील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले शनि मंदिराच्या दर्शनासाठी येणारे भाविकही कमी झाले आहेत. गोदावरील स्रान करून ते दर्शनासाठी जात असतात.४परंतु नदीचे पात्र महिन्यापूर्वीच आटल्याने कोठेतरी साचलेल्या डबक्यांमध्ये अंघोळ करण्याची वेळ भाविक व पर्यटकांवर आली आहे. बाजुलाच असणारे गार्डनही पाण्याावाचून वाळल्याचे दिसते.