शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

वैजापुरात 'घरकुल'चा लाभ श्रीमंताना; गरीब अद्यापही प्रतीक्षेतच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 20:17 IST

यामुळे वंचित लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

- मोबीन खान 

वैजापुर (औरंगाबाद ) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वैक्षण झालेल्या यादीत अनेक गरीब व पात्र लाभार्थ्यांची नावे असुनही अद्याप त्यांना घरे मिळाली नाहीत. मात्र श्रीमंत लोकांची नावे यादीत असुन त्यांना झटपट प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले मिळत आहेत. मग गरीबांना घरकुले कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला असुन सर्वैक्षणातुन तयार केलेल्या यादीबाबत संशय आहे. त्यामुळे गरीबांचे घरकुल श्रीमंतांना मिळत असल्याचे चित्र तालुक्यात बघायला मिळत असुन वंचित लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

शासनाने ज्यांना राहण्यासाठी घर नाही,जे अनेक वर्षे धोकादायक, जुन्या घरात राहतात त्यांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रयत्न सुरू केले आहेत.त्यातून सर्वांना घरे देण्यासाठी शासनाने पाऊल टाकले आहे.मध्यंतरी सर्वांच्या घरोघरी जावून सामाजिक,आर्थिक,जातनिहाय सर्वेक्षण करण्यात आले.त्यावेळी सर्व्हे करणारांनी जी माहिती जमा केली,त्या आधारावर शासनाने काही निकष,अटी-शर्ती लावून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी यादी तयार केली आहे.त्या सर्वेत मिळालेल्या माहितीवरून तयार करण्यात आलेल्या यादीतून ज्यांनी त्यांचे आयुष्य धोकादायक घर, कुडामेडाच्या घरात घालवले,ते त्या यादीत आलेच नाहीत.

अनेकांना अशी यादी असते याची पुसटशी कल्पनासुध्दा नाही,असे अनेक गरजू लोक,महिला या यादीपासून वंचित राहिल्याने सर्व्हे कसा केला,याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.शासनाने केलेल्या यादीनुसार शासनाला जरी गरजूंना घरे दिली असे वाटत असले तरी प्रत्यक्षात अनेक लाभार्थी या घरकुलांपासून वंचित राहिले आहेत.त्यातील अनेकजण साठी ओलांडलेले आहेत. त्यात हातावर पोट असणारी बहुतांश कुटुंबे आहेत.ज्यांनी जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी, निवाऱ्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला अशांना शासनाच्या योजनेतून घरे मिळत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत