शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

वैजापुरात 'घरकुल'चा लाभ श्रीमंताना; गरीब अद्यापही प्रतीक्षेतच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 20:17 IST

यामुळे वंचित लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

- मोबीन खान 

वैजापुर (औरंगाबाद ) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वैक्षण झालेल्या यादीत अनेक गरीब व पात्र लाभार्थ्यांची नावे असुनही अद्याप त्यांना घरे मिळाली नाहीत. मात्र श्रीमंत लोकांची नावे यादीत असुन त्यांना झटपट प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले मिळत आहेत. मग गरीबांना घरकुले कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला असुन सर्वैक्षणातुन तयार केलेल्या यादीबाबत संशय आहे. त्यामुळे गरीबांचे घरकुल श्रीमंतांना मिळत असल्याचे चित्र तालुक्यात बघायला मिळत असुन वंचित लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

शासनाने ज्यांना राहण्यासाठी घर नाही,जे अनेक वर्षे धोकादायक, जुन्या घरात राहतात त्यांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रयत्न सुरू केले आहेत.त्यातून सर्वांना घरे देण्यासाठी शासनाने पाऊल टाकले आहे.मध्यंतरी सर्वांच्या घरोघरी जावून सामाजिक,आर्थिक,जातनिहाय सर्वेक्षण करण्यात आले.त्यावेळी सर्व्हे करणारांनी जी माहिती जमा केली,त्या आधारावर शासनाने काही निकष,अटी-शर्ती लावून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी यादी तयार केली आहे.त्या सर्वेत मिळालेल्या माहितीवरून तयार करण्यात आलेल्या यादीतून ज्यांनी त्यांचे आयुष्य धोकादायक घर, कुडामेडाच्या घरात घालवले,ते त्या यादीत आलेच नाहीत.

अनेकांना अशी यादी असते याची पुसटशी कल्पनासुध्दा नाही,असे अनेक गरजू लोक,महिला या यादीपासून वंचित राहिल्याने सर्व्हे कसा केला,याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.शासनाने केलेल्या यादीनुसार शासनाला जरी गरजूंना घरे दिली असे वाटत असले तरी प्रत्यक्षात अनेक लाभार्थी या घरकुलांपासून वंचित राहिले आहेत.त्यातील अनेकजण साठी ओलांडलेले आहेत. त्यात हातावर पोट असणारी बहुतांश कुटुंबे आहेत.ज्यांनी जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी, निवाऱ्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला अशांना शासनाच्या योजनेतून घरे मिळत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत