शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

एक वेडापीर तीन दशके जपतोय खुबसुरत उर्दू जबान!

By admin | Updated: May 12, 2015 00:55 IST

औरंगाबाद : अदबी उर्दू भाषेच्या दखनी ढंगाला जन्म देणारे शहर ही औरंगाबादची ओळख आता इथला सामान्य माणूस विसरू पाहतो आहे

औरंगाबाद : अदबी उर्दू भाषेच्या दखनी ढंगाला जन्म देणारे शहर ही औरंगाबादची ओळख आता इथला सामान्य माणूस विसरू पाहतो आहे. मात्र, रांगडी, रसाळ मराठी आणि नजाकतदार रुमानी उर्दू यांच्यातील अक्षरसंवादासाठी गेली तीन दशके शहरातील शायर-पत्रकार खान शमीम ‘इदारा- ए- अदब- ए- उर्दू’ या मंचाच्या माध्यमातून अबोलपणे कार्यरत आहेत. प्रख्यात शायर दाग देहलवी यांनी लिहून ठेवले आहे की ‘उर्दू है जिसका नाम हमीं जानते है दाग; सारे जहां में धूम हमारें जबां की है.’ मात्र, काळाच्या ओघात या भाषेच्या शहराच्या गलीमोहल्ल्यात उमटलेल्या नजाकतदार पाऊलखूणा धूसर होत आहेत. अशावेळी याचे कारण सांगताना शमीम खान परखडपणे सुनावतात, ‘बंटवारे के बाद मुल्ला-मौलवीयों ने उर्दू को बेवजह कलमा पढ़ा दिया!’ मात्र, या भाषिक ध्रुवीकरणाच्या वादळातही गेल्या सत्तावीस वर्षांपासून भाषासंवेदन जागविण्याची ही पणती खान यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ओंजळीत जपली आहे. लाल मशिदीजवळ असलेल्या त्यांच्या घरी हे वर्ग चालतात. त्यांच्या घरातली बहुभाषिक पुस्तकांनी भरलेली कपाटे लगेचच लक्ष वेधतात.या वर्गांच्या संकल्पनेबाबत विचारले असता वयाची साठी पार केलेले खान सांगतात की उर्दू भाषा, संस्कृती व जीवनशैली ही या शहरातील मुस्लिमांच्याच नव्हे तर गैरमुस्लिमांच्याही अस्तित्वाचा भाग राहिली आहे. मात्र, काळाच्या ओघात अनेक नकोशा घटनांमुळे उर्दूवर ‘मुस्लिम भाषा’ असा शिक्का मारला गेला. मात्र, आजही उर्दूबाबत आस्था व कुतूहल असणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यासाठीच हा अट्टहास इतकी वर्षे अखंड सुरूआहे.आजवर किमान चारशे लोक उर्दूची मुळाक्षरे गिरवीत अस्खलित लेखन-वाचन शिकलेत. माझा विद्यार्थी सच्चिदानंद भागवत याचा तर उर्दूत एक उत्कृष्ट कवितासंग्रही प्रकाशित झाला आहे. सध्याचे सहायक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे सध्या माझे विद्यार्थी आहेत! त्यात माझ्यासह माझी पत्नी जरिना खान, संस्थासचिव अजहर शकील, उपाध्यक्ष हबीब पाशा हेसुद्धा शिकविण्यात सहभागी होतात.यासह शहरातील प्रख्यात ज्येष्ठ शायर बशर नवाज येतात तेव्हा उर्दू गझलियत, अफसाने आणि नज्म यांची सुरेख मैफल रंगते. खान स्वत: शायरीतून थेट सामाजिक-राजकीय भूमिका मांडणारे तरक्कीपसंद शायर आहेत.भाषा हा मनामनांमध्ये संवादाचे पूल बांधण्याचे शाश्वत माध्यम आहे, यावर मी विश्वास ठेवतो. जीवनाने जे शिकवले, तेच मी इतरांना सांगतो! असे ते शेवटी सांगतात.