शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

एक वेडापीर तीन दशके जपतोय खुबसुरत उर्दू जबान!

By admin | Updated: May 12, 2015 00:55 IST

औरंगाबाद : अदबी उर्दू भाषेच्या दखनी ढंगाला जन्म देणारे शहर ही औरंगाबादची ओळख आता इथला सामान्य माणूस विसरू पाहतो आहे

औरंगाबाद : अदबी उर्दू भाषेच्या दखनी ढंगाला जन्म देणारे शहर ही औरंगाबादची ओळख आता इथला सामान्य माणूस विसरू पाहतो आहे. मात्र, रांगडी, रसाळ मराठी आणि नजाकतदार रुमानी उर्दू यांच्यातील अक्षरसंवादासाठी गेली तीन दशके शहरातील शायर-पत्रकार खान शमीम ‘इदारा- ए- अदब- ए- उर्दू’ या मंचाच्या माध्यमातून अबोलपणे कार्यरत आहेत. प्रख्यात शायर दाग देहलवी यांनी लिहून ठेवले आहे की ‘उर्दू है जिसका नाम हमीं जानते है दाग; सारे जहां में धूम हमारें जबां की है.’ मात्र, काळाच्या ओघात या भाषेच्या शहराच्या गलीमोहल्ल्यात उमटलेल्या नजाकतदार पाऊलखूणा धूसर होत आहेत. अशावेळी याचे कारण सांगताना शमीम खान परखडपणे सुनावतात, ‘बंटवारे के बाद मुल्ला-मौलवीयों ने उर्दू को बेवजह कलमा पढ़ा दिया!’ मात्र, या भाषिक ध्रुवीकरणाच्या वादळातही गेल्या सत्तावीस वर्षांपासून भाषासंवेदन जागविण्याची ही पणती खान यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ओंजळीत जपली आहे. लाल मशिदीजवळ असलेल्या त्यांच्या घरी हे वर्ग चालतात. त्यांच्या घरातली बहुभाषिक पुस्तकांनी भरलेली कपाटे लगेचच लक्ष वेधतात.या वर्गांच्या संकल्पनेबाबत विचारले असता वयाची साठी पार केलेले खान सांगतात की उर्दू भाषा, संस्कृती व जीवनशैली ही या शहरातील मुस्लिमांच्याच नव्हे तर गैरमुस्लिमांच्याही अस्तित्वाचा भाग राहिली आहे. मात्र, काळाच्या ओघात अनेक नकोशा घटनांमुळे उर्दूवर ‘मुस्लिम भाषा’ असा शिक्का मारला गेला. मात्र, आजही उर्दूबाबत आस्था व कुतूहल असणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यासाठीच हा अट्टहास इतकी वर्षे अखंड सुरूआहे.आजवर किमान चारशे लोक उर्दूची मुळाक्षरे गिरवीत अस्खलित लेखन-वाचन शिकलेत. माझा विद्यार्थी सच्चिदानंद भागवत याचा तर उर्दूत एक उत्कृष्ट कवितासंग्रही प्रकाशित झाला आहे. सध्याचे सहायक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे सध्या माझे विद्यार्थी आहेत! त्यात माझ्यासह माझी पत्नी जरिना खान, संस्थासचिव अजहर शकील, उपाध्यक्ष हबीब पाशा हेसुद्धा शिकविण्यात सहभागी होतात.यासह शहरातील प्रख्यात ज्येष्ठ शायर बशर नवाज येतात तेव्हा उर्दू गझलियत, अफसाने आणि नज्म यांची सुरेख मैफल रंगते. खान स्वत: शायरीतून थेट सामाजिक-राजकीय भूमिका मांडणारे तरक्कीपसंद शायर आहेत.भाषा हा मनामनांमध्ये संवादाचे पूल बांधण्याचे शाश्वत माध्यम आहे, यावर मी विश्वास ठेवतो. जीवनाने जे शिकवले, तेच मी इतरांना सांगतो! असे ते शेवटी सांगतात.