शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 19:23 IST

भारतात संशोधनासाठी मिळणाऱ्या एकू ण अनुदानापैकी ९० टक्के अनुदान केवळ परदेशात तयार झालेली साधने आयात करण्यासाठी खर्च होते. यातून निर्माण झालेल्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांनी केले.

औरंगाबाद : भारतात संशोधनासाठी मिळणाऱ्या एकू ण अनुदानापैकी ९० टक्के अनुदान केवळ परदेशात तयार झालेली साधने आयात करण्यासाठी खर्च होते. यातून निर्माण झालेल्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांनी केले.

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कम्प्युटिंग इन इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या विषयावर चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन अमेरिकेतील नामांकित एमआयआर लॅबचे संचालक अजित अब्राहम यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ़ एस़ पी़ यावलकर, डॉ़ एस़ बी़ देवसारकर, विवेक भोसले, संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची उपस्थिती होती. डॉ. गायकर म्हणाले की, भारताच्या आर्थिक विकासास हातभार लावण्यासाठी उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. हे उत्पादन दर्जेदार असावे, यासाठी संशोधकांच्या संशोधनाचा वापर उत्पादनाच्या वेळी झाला पाहिजे. त्याशिवाय संशोधनाला चांगले दिवस येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. यावलकर म्हणाले, संशोधन हे शिक्षण क्षेत्रातून उद्योगाकडे गेले पाहिजे, त्यासाठी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे अपेक्षित आहे. अशा परिषदांमधून या प्रक्रियेला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले. उद्योजक विवेक भोसले म्हणाले, संशोधन संस्कृती ही परिषदेपुरतीच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाºया विविध समस्यांना विद्यार्थ्यांसमोर चर्चेला घेऊन त्या सोडविण्यासाठी संशोधन केले पाहिजे. याला अर्थपूर्ण जोड असली पाहिजे.

तर त्या संशोधनाचे व्यावसायिक स्वरुपात रुपांतर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी महाविद्यालयाने राबविलेल्या विविध विद्यार्थी उपयोगी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. गजेंद्र गंधे, डॉ. ब्रिजेश अय्यर, उपप्राचार्य प्रा. संजय कल्याणकर, डॉ. सत्यवान धोंडगे, प्रा. प्रकाश तौर, डॉ़ राजेश औटी, प्रा़ उमेश पाटील, डॉ़ सुनील शिंदे, प्रा. रुपेश रेब्बा यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद