शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 19:23 IST

भारतात संशोधनासाठी मिळणाऱ्या एकू ण अनुदानापैकी ९० टक्के अनुदान केवळ परदेशात तयार झालेली साधने आयात करण्यासाठी खर्च होते. यातून निर्माण झालेल्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांनी केले.

औरंगाबाद : भारतात संशोधनासाठी मिळणाऱ्या एकू ण अनुदानापैकी ९० टक्के अनुदान केवळ परदेशात तयार झालेली साधने आयात करण्यासाठी खर्च होते. यातून निर्माण झालेल्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांनी केले.

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कम्प्युटिंग इन इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या विषयावर चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन अमेरिकेतील नामांकित एमआयआर लॅबचे संचालक अजित अब्राहम यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ़ एस़ पी़ यावलकर, डॉ़ एस़ बी़ देवसारकर, विवेक भोसले, संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची उपस्थिती होती. डॉ. गायकर म्हणाले की, भारताच्या आर्थिक विकासास हातभार लावण्यासाठी उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. हे उत्पादन दर्जेदार असावे, यासाठी संशोधकांच्या संशोधनाचा वापर उत्पादनाच्या वेळी झाला पाहिजे. त्याशिवाय संशोधनाला चांगले दिवस येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. यावलकर म्हणाले, संशोधन हे शिक्षण क्षेत्रातून उद्योगाकडे गेले पाहिजे, त्यासाठी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे अपेक्षित आहे. अशा परिषदांमधून या प्रक्रियेला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले. उद्योजक विवेक भोसले म्हणाले, संशोधन संस्कृती ही परिषदेपुरतीच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाºया विविध समस्यांना विद्यार्थ्यांसमोर चर्चेला घेऊन त्या सोडविण्यासाठी संशोधन केले पाहिजे. याला अर्थपूर्ण जोड असली पाहिजे.

तर त्या संशोधनाचे व्यावसायिक स्वरुपात रुपांतर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी महाविद्यालयाने राबविलेल्या विविध विद्यार्थी उपयोगी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. गजेंद्र गंधे, डॉ. ब्रिजेश अय्यर, उपप्राचार्य प्रा. संजय कल्याणकर, डॉ. सत्यवान धोंडगे, प्रा. प्रकाश तौर, डॉ़ राजेश औटी, प्रा़ उमेश पाटील, डॉ़ सुनील शिंदे, प्रा. रुपेश रेब्बा यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद