शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 19:23 IST

भारतात संशोधनासाठी मिळणाऱ्या एकू ण अनुदानापैकी ९० टक्के अनुदान केवळ परदेशात तयार झालेली साधने आयात करण्यासाठी खर्च होते. यातून निर्माण झालेल्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांनी केले.

औरंगाबाद : भारतात संशोधनासाठी मिळणाऱ्या एकू ण अनुदानापैकी ९० टक्के अनुदान केवळ परदेशात तयार झालेली साधने आयात करण्यासाठी खर्च होते. यातून निर्माण झालेल्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांनी केले.

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कम्प्युटिंग इन इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या विषयावर चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन अमेरिकेतील नामांकित एमआयआर लॅबचे संचालक अजित अब्राहम यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ़ एस़ पी़ यावलकर, डॉ़ एस़ बी़ देवसारकर, विवेक भोसले, संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची उपस्थिती होती. डॉ. गायकर म्हणाले की, भारताच्या आर्थिक विकासास हातभार लावण्यासाठी उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. हे उत्पादन दर्जेदार असावे, यासाठी संशोधकांच्या संशोधनाचा वापर उत्पादनाच्या वेळी झाला पाहिजे. त्याशिवाय संशोधनाला चांगले दिवस येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. यावलकर म्हणाले, संशोधन हे शिक्षण क्षेत्रातून उद्योगाकडे गेले पाहिजे, त्यासाठी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे अपेक्षित आहे. अशा परिषदांमधून या प्रक्रियेला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले. उद्योजक विवेक भोसले म्हणाले, संशोधन संस्कृती ही परिषदेपुरतीच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाºया विविध समस्यांना विद्यार्थ्यांसमोर चर्चेला घेऊन त्या सोडविण्यासाठी संशोधन केले पाहिजे. याला अर्थपूर्ण जोड असली पाहिजे.

तर त्या संशोधनाचे व्यावसायिक स्वरुपात रुपांतर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी महाविद्यालयाने राबविलेल्या विविध विद्यार्थी उपयोगी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. गजेंद्र गंधे, डॉ. ब्रिजेश अय्यर, उपप्राचार्य प्रा. संजय कल्याणकर, डॉ. सत्यवान धोंडगे, प्रा. प्रकाश तौर, डॉ़ राजेश औटी, प्रा़ उमेश पाटील, डॉ़ सुनील शिंदे, प्रा. रुपेश रेब्बा यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद