शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटचा वापर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:15 IST

औरंगाबाद : विना हेल्मेट दुचाकी चालविताना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यूचा धोका अधिक असतो.

औरंगाबाद : विना हेल्मेट दुचाकी चालविताना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यूचा धोका अधिक असतो. ही बाब लोकमतने सुरू केलेल्या ‘दोस्ती हेल्मेटशी दोस्ती’ या वृत्तमालिकेतून नियमाने वाचकांपर्र्यंत पोहोचविण्यात येत आहे. हेल्मेटसंदर्भात आलेले बरे-वाईट अनुभवही सामान्य नागरिक लोकमतच्या माध्यमातून वाचकांना सांगत आहेत. शिवाय वाहतूक पोलिसांकडूनही हेल्मेटसंदर्भात जनजागरण करण्यात येत असल्याने त्याचा चांगला परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील दुचाकीचालकांकडून हेल्मेटचा वापर वाढल्याचे दिसत आहे.विना हेल्मेट दुचाकी चालविताना अपघात घडल्यास मेंदूला गंभीर मार लागून गतवर्षी सुमारे १०२ जणांना प्राणास मुकावे लागले. तसेच त्याहून किती तरी पट लोकांना कित्येक दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मरण पावलेल्या अथवा जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यालाही गंभीर परिणाम भोगावे लागतात. दुचाकी अपघातामधील मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट हा एक उत्तम उपाय आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी हेल्मेट वापरण्यासंदर्भात जनजागरण सुरू केले आहे. लोकमतने ‘दोस्ती हेल्मेटशी दोस्ती’ ही वृत्त मालिका सुरू केली. या वृत्त मालिकेच्या माध्यमातून हेल्मेटचे महत्त्व सामान्य वाचकांपर्यंत पोहोचत आहे. त्याची गंभीर दखल दुचाकीचालक वाचक घेत आहेत. त्यांच्याकडून आता हेल्मेटचा वापर वाढल्याचे दिसत आहे. महिनाभरापूर्वी रस्त्यावर अपवादाने दिसणाऱ्या हेल्मेटधारी दुचाकीस्वारांची संख्या आता झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. पोलिसांची हेल्मेट रॅली पाहिली अन्..मी आजपर्यंत दुचाकी चालविताना कधीच हेल्मेट वापरलेले नाही; परंतु वाहतूक सुरक्षा पंधरवडा असल्याने ५ जानेवारी रोजी पोलिसांनी काढलेली हेल्मेट दुचाकी रॅली पाहिली आणि मनातल्या मनात स्वत:बद्दलच लाज वाटायला लागली. हेल्मेट वापरण्यासंदर्भात पोलिसांकडून किती मूलभूत बाब सांगितली जात आहे! आपण एवढे दिवस ही बाब समजू शकलो नाही. मात्र, पोलिसांची हेल्मेट रॅली पाहिल्यापासून हेल्मेटशिवाय दुचाकीवर बसायचे नाही, हा संकल्प केला आणि हेल्मेट घालूनच दुचाकी प्रवास सुरू केला. हेल्मेटने केवळ तुमच्याच डोक्याचेच नव्हे तर तुमच्या आयुष्याचे रक्षण होते. त्यामुळे हेल्मेटचे केवळ फायदेच आहेत... -ऋतिक मैड,विद्यार्थी विवेकानंद महाविद्यालय तुमचे अनुभव पाठवा...हेल्मेट ही त्रासदायक वस्तू नसून, त्याच्या वापरामुळे जिवावर बेतलेले संकट टळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दुचाकी अपघातात हेल्मेटमुळे तुमचे अथवा कुटुंबातील सदस्याचे प्राण वाचले असल्यास आम्हाला तुमचे अनुभव कळवावेत. आपले अनुभव लोकमत कार्यालयात लेखी स्वरूपात आणून द्यावेत अथवा व्हॉटस् अ‍ॅप क्र मांक 9765353544 किंवा 9172515115 या क्रमांकावर पाठवावेत.