शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

उर्दू शाळा भरतेय उघड्यावर

By admin | Updated: June 26, 2014 00:34 IST

धारुर: येथील सराय मीर आलम व मस्जिद या ठिकाणी भरणारी उर्दू मिलिया शाळा स्थानिक मस्जिद कमिटी व संस्थेच्या वादात आठ दिवसापासून उघड्यावर भरत आहे.

धारुर: येथील सराय मीर आलम व मस्जिद या ठिकाणी भरणारी उर्दू मिलिया शाळा स्थानिक मस्जिद कमिटी व संस्थेच्या वादात आठ दिवसापासून उघड्यावर भरत आहे. विद्यार्थ्यांनाही उघड्यावरच बसण्याची वेळ आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून हा वाद प्रशासन मिटवणार का? असा प्रश्न सर्वसामान्य मुस्लिम पालकांमधून केला जात आहे.धारुर शहरात एकमेव असणारी मिलिया उर्दू शाळा १९६८ पासून सराय मिर आलम व मस्जिद या जागेत आहे. ही शाळा पहिली ते दहावी पर्यंत असून या शाळेत ११०० विद्यार्थी आहेत. वक्फबोर्डाकडून करारावर या संस्थेला शाळेसाठी ही जागा देण्यात आलेली आहे. दोन वर्षापूर्वी संस्थेने बांधकामासाठी शाळेची एक बाजू पाडण्यात आली. दुसऱ्या बाजूच्या खोल्यात शाळा भरवली जाऊ लागली. या बांधकामास मस्जिदच्या स्थानिक व्यवस्थापन समितीने विरोध केला. यावर वक्फबोर्डाकडे हरकत घेतली. त्यावर बांधकामास वक्फ बोर्डाने जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे हे बांधकाम त्यावेळीपासून बंद आहे.या ठिकाणाला तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी भेट देऊन पाहणी केली होती. संस्था व मस्जिद स्थानिक कमिटी यांच्यातील वाद अद्यापपर्यंत न मिटल्यामुळे यावर्षी एका बाजूला भरणाऱ्या शाळेच्या जागेत १५ जूनच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी शाळा भरणाऱ्या ठिकाणी भंगार साहित्य टाकले. यामुळे आठ दिवसापासून १६ जूनपासून ही शाळा उघड्यावर भरत असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. संस्था व स्थानिक मस्जिद कमिटी यांच्या वादामध्ये विद्यार्थ्यांचे मात्र हाल होत आहेत. यावादाकडे प्रशासन लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य पालकामधून होत आहे.धार्मिक ठिकाणी शाळा चालवणे योग्य नाही - सादेक इनामदारधार्मिक स्थळाच्या ठिकाणी शाळा असणे योग्य नाही. शाळेच्या गोंगाटाचा त्रास या धार्मिक स्थळी येणाऱ्यांना होतो. शाळेसाठी शहरात संस्थेला जागाही घेऊन देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र संस्थेचा हट्ट याच जागेचा का ? हे माहित नाही, अशी प्रतिक्रिया मस्जिद स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सादेक इनामदार यांनी सांगितले.प्रशासनाचा पुढाकार हवा - शेख महंमद शरीफस्थानिक मस्जिद कमिटी व संस्था यांचा वाद काही असो, विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागणे योग्य नाही. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने या प्रश्नात लक्ष घालून तात्काळ विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक महमंद शरीफ यांनी व्यक्त केली.संस्थेकडे तीस वर्षाचा करार - मुख्याध्यापक सय्यद हारुणया जागेचा संस्थेकडे तीस वर्षाचा करार असून १५ जून रोजी अज्ञात व्यक्तींनी शाळेचे साहित्य बाहेर टाकले. त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागले आहे. साहित्य बाहेर टाकल्याप्रकरणी पोलिस ठाण्याला तक्रारही दिली असल्याचे मुख्याध्यापक सय्यद हारुण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)