शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

महिनाभरातच उरकला खरीप हंगाम

By admin | Updated: July 30, 2015 00:10 IST

बीड : यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने १५ जुनला जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला सुरवात झाली. मात्र १५ जुन ते १५ जुलै या कालावधीतच खरीपाचा पेरा, मशागत

बीड : यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने १५ जुनला जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला सुरवात झाली. मात्र १५ जुन ते १५ जुलै या कालावधीतच खरीपाचा पेरा, मशागत व पावसाने ओढ दिल्याने पिके मोडण्याची नामुष्कीही बळीराजावर आली आहे. तीन ते साडेतीन महिने चालणाऱ्या खरीप हंगाम यंदा मात्र केवळ महिन्याभरातच उरकला आहे. हंगामाच्या सुरवातीच्या काळात पावसाने जिल्ह्यात हजेरी लवली होती. त्या तोडक्या पावसाच्या जोरावरच खरीपाची पेरणी करण्यास सुरवात झाली होती. तुरळक ठिकाणी पाऊस होत असल्याने जिल्ह्यात २४ जुनपर्यंत २ लाख ७५ हजार २१४ हेक्टरवर म्हणजेच सरासरी लागवड क्षेत्रापैकी ४९ टक्के पेरा झाला होता. जुन अखेर पावसाने ओढ दिल्याने ४ लाख ८ हजार ३१६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. गतवर्षीप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकावरच शेतकऱ्यांनी भर दिला होता. जिल्ह्यात खऱ्या अर्थाने जुलै महिन्यातच खरीपाचा पेरा केला जातो. मात्र, जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पावसाने दडी मारली होती. परिणामी पेऱ्यात घट होत गेली. पावसाने ओढ दिल्याने खरीपातील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी हलक्या मशागतीस सुरवात केली. आहे ती पिके जोपसण्याचा अट्टाहास शेतकऱ्यांनी केला. मात्र तब्बल गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस निरंक असल्याने पिके जागच्या जागी जळून जात आहेत. जोमात आलेल्या पिकांना उभारी देण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयत्न केले. धारुर तालुक्यातील कासारी परिसरात तर शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करून पिके जगविण्याचा केविलवाणा प्रयोग केला मात्र पावसाने हजेरीच लावली नसल्याने जिल्ह्यातील जवळपास ५ लाख २१ हजार ३४४ हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. कृषि विभगाकडून ३१ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास २ लाख ३४ हजारावर दुबार पेरणीची शक्यता वर्तिवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात यापैक्षाही अधिकच्या पिकांचे नुकसान झाले असल्याचे समजत आहे. पाण्याअभावी व सोसाट्याच्या वाऱ्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पाऊस पडल्यास दुबार पेरणी अन्यथा रब्बीची तयारी या उद्देशाने अनेक शेतकरी उभ्या पिकावर नांगूर फिरवत आहेत. माजलगांव, अंबाजोगाई आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांची मोडणी करण्यास सुरवात केली आहे. गत तीन वर्षाचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदाही कापूस व सोयाबीनवरच भर दिला होता. याकरिता हंगामपुर्व जमिनीची मशागत, पेरणी त्यानंतर पिकांची मशागत तसेच पिकांची जपवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम प्रयत्नही केले मात्र सरतेशेवटी खरीप यंदाही फेल गेला असल्याची परिस्थिती आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात झालेल्या पीक मोडणीचा हेक्टरी आकडा अद्यापपर्यंत कृषि विभागाकडे आला नसल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे १५ जुलैला सुरवात झालेला खरीप हंगाम केवळ पावसाअभावी महिन्याभरातच मोडीत काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे शिवाय लाखोंची बि-बीयाणे जमिनीत गाडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे.