शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

आगामी २० वर्षे नव्या प्रतिजैविकांची निर्मिती अशक्य; डॉक्टरांनी त्यांचा योग्य प्रमाणात वापर करावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:15 IST

मागील १० वर्षांमध्ये नवीन प्रतिजैविके बनलेली नाहीत आणि आगामी २० वर्षेही नव्या प्रतिजैविकांची निर्मिती अशक्य आहे. त्यामुळे उपलब्ध प्रतिजैविकांचा वापर योग्यवेळी आणि योग्य प्रमाणातच करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रतिजैविकांमुळे आजारांतून बाहेर पडण्यासाठी मोठे पाऊल पडलेसततच्या आणि अतिवापरामुळे अनेक आजारांमध्ये प्रतिजैविकांचा परिणाम दिसून येत नाही.

औरंगाबाद : मागील १० वर्षांमध्ये नवीन प्रतिजैविके बनलेली नाहीत आणि आगामी २० वर्षेही नव्या प्रतिजैविकांची निर्मिती अशक्य आहे. त्यामुळे उपलब्ध प्रतिजैविकांचा वापर योग्यवेळी आणि योग्य प्रमाणातच करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले.

शहरात रविवारी ‘अ‍ॅन्टिमायक्रोबियल स्टिवरशिप’ यासंदर्भात कार्यशाळा झाली. यानिमित्त कमलनयन बजाज रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आलोक श्रीवास्तव, डॉ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे, मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयाचे संचालक डॉ. राहुल पंडित, डॉ. कपिल झिरपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा डॉ. श्रीवास्तव म्हणाले, १९४२ मध्ये प्रतिजैविकांचा शोध लागला. प्रतिजैविकांमुळे आजारांतून बाहेर पडण्यासाठी मोठे पाऊल पडले; परंतु सततच्या आणि अतिवापरामुळे अनेक आजारांमध्ये प्रतिजैविकांचा परिणाम दिसून येत नाही. जीवाणूंच्या संरचनेत बदल झाला आहे. तुलनेत नव्या प्रतिजैविकांची निर्मिती झालेली नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन अमेरिकेत २००९ मध्येच प्रतिजैविकांच्या वापरासंदर्भात जनजागृती सुरू झाली. अशीच जागृती भारतातही होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, बाह्यरुग्ण विभाग ते ‘आयसीयू’ अशा सर्व ठिकाणी रुग्णांना प्रतिजैविके दिली जातात. तेव्हा ती देणे गरजेचे आहे का, याचा विचार करून योग्य प्रमाणात प्रतिजैविके दिली पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नयेत; परंतु औषधी दुकानांमध्ये जाऊन सर्रास प्रतिजैविके घेतली जातात. ते थांबले पाहिजे. त्यासाठी डॉक्टर, फार्मासिस्ट आणि नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. डॉ. पंडित म्हणाले, प्रतिजैविकांच्या योग्य वापरासाठी मराठवाड्यात प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी डॉक्टरांनी आता पुढाकार घेतला आहे. 

प्रिस्क्रिप्शनची बंधने पाळावीतशासनाने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर काही बंधने आणली आहेत. औषधी लिहिताना दिनांक, औषधी घेण्याचा कालावधी हे बंधनकारक केले आहे. औषधी दुकानांवर जुन्या प्रिस्क्रिप्शनवर औषधी देता कामा नये. प्रतिजैविकांच्या नियंत्रित वापरासाठी या बंधनांचे पालन महत्त्वपूर्ण ठरेल, असे डॉ. झिरपे यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधंdoctorडॉक्टर