शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

टाकावू वाणाच्या सामानावर होतोय अनाठायी खर्च

By admin | Updated: January 14, 2016 23:13 IST

वसमत : संक्रांतीनिमित्त वाणाचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात महिलांची गर्दी होत आहे. त्याची दुकानेही मोठ्या संख्येने थाटलेली आहेत

वसमत : संक्रांतीनिमित्त वाणाचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात महिलांची गर्दी होत आहे. त्याची दुकानेही मोठ्या संख्येने थाटलेली आहेत. मात्र बहुतेक साहित्य हे कोणत्याही उपयोगाचे नाहीत. तरीही महिला एकमेंकींना वाण देण्यासाठी पैसे मोजून या टाकावू वस्तू खरेदी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.मकरसंक्रांत हा महिलांचा महत्त्वाचा सण आहे. यामध्ये महिलांचे एकमेकींना वाण देण्याचा कार्यक्रम घरोघर होते. त्यानिमित्ताने महिलांच्या गाठी-भेटी व मैत्री वृद्धिंगत होत असते. मात्र वाण देताना ज्या वस्तू वापरल्या जातात त्या बहुतेक टाकाऊ दर्जाच्याच असतात. ज्यांना हे वाण म्हणून दिले जाते त्यांच्याही उपयोगाची ती वस्तू ठरत नाही. वाण देणाऱ्या महिलांनी मात्र पैसे मोजून ती वस्तू खरेदी केलेली असते. असा हा दोन्ही बाजूंनी नुकसानीचा व व्यापाऱ्यांना मात्र प्रचंड फायद्याचा प्रकार आहे. प्रत्येक घरी किमान २०० ते ३०० महिलांना वाण दिले जाते. स्वत:चे वाण वाटावे, अशी बाजारातून पाच ते दहा रुपयांपर्यंतची वस्तू शोधली जाते. यात मग लहान-लहान वाट्या, ग्लास, प्लास्टिकचे चमचे, डब्बे, टोपल्या, आरती, पेन, कांड्या आदी वस्तूंचाच भरणा असतो. यापैकी एकही वस्तू घरी वापरता येत नाही. त्यांचा कचराच होतो, हे उघड चित्र असतानाही वाणासाठी किमान प्रत्येक घरी ५०० ते हजार रुपयांचा खर्च होतो. वाण वाटणाऱ्या व घेणाऱ्या महिलांची संख्या याचा हिशेब लावला तर होणारा खर्च डोळे फिरवणारा ठरत आहे. मात्र या बाबीकडे अद्याप कोणी गांभीर्याने पाहिलेले नाही. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता अशा टाकाऊ वाणाच्या साहित्यावर खर्च करण्याऐवजी काही तरी दैनंदिन गरजेच्या वस्तूचा वापर व्हावा, अन्यथा तसे साहित्य घेवू नये व देवूही नये, असा विचार समोर येणे गरजेचे आहे. महिला मंडळांनी वाण देण्याघेण्याच्या कार्यक्रमाद्वारे अशा व्यर्थ खर्चास फाटा देण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. वर्षभर जे साहित्य गोदामात पडून आहे, ते वाणाचे साहित्य म्हणून विकण्यासाठी विक्रेत्यांनी बाहेर काढल्याचे सध्याचे चित्र आहे.स्वस्त म्हणून गंज लागलेली भांडीही विक्री होताना दिसत आहेत. प्लास्टिकच्या वस्तू तर एवढ्या तकलादू असतात की अनेकदा घरी जाईपर्यंतही तडकतात. अशा टाकावू वस्तूंवर व्यर्थ का केला जातो हे मात्र कोडेच आहे. या पैशांतून एखादे सामूहिक विधायक कार्याचे उभे राहिले तर ते खऱ्या अर्थाने सामाजिक ऋण फेडण्याचे वाण ठरू शकते. या दृष्टिने महिलांनी विचार करून खऱ्या अर्थाने टाकावू वाणावरच संक्रांत आणण्याची गरज आहे. (वार्ताहर)