शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

विनापरवाना अडत वसुली !

By admin | Updated: May 25, 2014 01:09 IST

दिनेश गुळवे , बीड शहरातील भाजी मंडईतील अडत व्यापारी नियमापेक्षा अधिक अडत घेत असल्याने त्यांचे सर्वच परवाने कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केले होते.

दिनेश गुळवे , बीड शहरातील भाजी मंडईतील अडत व्यापारी नियमापेक्षा अधिक अडत घेत असल्याने त्यांचे सर्वच परवाने कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केले होते. यानंतर व्यापार्‍यांनी खेटे घालूनही त्यांना परवाना मिळत नसल्याने सध्या विनापरवानाच शेतकर्‍यांकडून अडत वसुली सुरू आहे. कृउबा व नगरपालिका यांच्यातील त्रांगड्यामुळे भाजी मंडई समस्यांचे माहेरघर बनली आहे. बीड शहरातील खासबाग परिसरात व्यापार्‍यांसाठी नगरपालिकेने गाळे बांधून देऊन येथे भाजी मार्केट उभारले आहे. येथे व्यापार करण्यासाठी ८५ व्यापार्‍यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने परवाने दिले होते. येथील व्यापारी शेतकर्‍यांकडून नियमापेक्षा अधिक ‘अडत’ वसूल करीत असल्याचा मुद्दा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनचे अ‍ॅड. अजित देशमुख यांच्यासह शेतकर्‍यांनी उपस्थित केला होता. यानंतर या प्रकरणात तात्कालीन जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर कृउबाने सर्व परवाने २८ नोव्हेंबर २०१३ रोजी रद्द केले होते. येथील गाळे नगरपालिकेने बांधून दिले असले परवाना कृउबाने दिला होता. असे असले तरी कृउबा कडून नियमन केले जात नव्हते, तसेच येथे काहीच सुविधा देण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे कृउबा समितीला परवाना देण्याचा अधिकार काय? असा मुद्दाही उपनिबंधक कार्यालयाने उपस्थित केला होता. सध्या येथील व्यापार्‍यांकडे परवाने नसतानाही ते आठ ते दहा टक्के अडत वसूल करीत असून यामुळे शेतकर्‍यांची लूट होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश धांडे यांनी केला आहे. मंडईत शौचालय, भाजीपाला ठेवण्यासाठी सावली, पार्किंग नाही, जरासाही पाऊस आला तर व्यापार्‍यांचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे भिजतात तसेच मंडईत घाणीचे साम्राज्य आहेत. अशा अनेक समस्यांनी ही मंडई ग्रासली असून वारंवार खेटे घालूनही व्यापार्‍यांना परवाना मिळत नसल्याने व्यापारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. जमिरुद्दीन बागवान यांनी सांगितले. तर, कृउबा सचिव आर. पी. बहिर म्हणाले की, व्यापारी नियमांची पुर्तता करीत नसल्याने त्यांना परवाने दिले जात नाहीत. येथे आठ ते दहा टक्के अडत घेऊन शेतकर्‍यांची लूट केली जात होती.यामुळे कारवाई करण्यात आली होती. भाजीमंडईत असलेल्या गाळ्यामध्ये हवा येत नसल्याने भाजीपाला गाळ्यात ठेवला की, एका दिवसात सडतो. तर, बाहेर ठेवल्यास भाजीपाला चोरी जातो. येथे सावलीही नसल्याने उन्हात काम करावे लागते. येथील गाळे नगर पालिकेने बांधले असले तरी परवाना कृउबाचा आहे. त्यामुळे येथील नियमन कोणी करायचे? या त्रांगड्यात सध्ये येथे व्यापार्‍यांसह ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.