शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

बीड बायपासवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:25 IST

बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवाहनांच्या सात ते आठ किलो मिटरपर्यंत रांगा लागल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवाहनांच्या सात ते आठ किलो मिटरपर्यंत रांगा लागल्या.शहराची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवर सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत जडवाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. यामुळे जडवाहने कालपर्यंत बीड बायपास रस्त्याचा वापर करीत होते. बीड बायपासवर महिनाभरात पाच जणांचे अपघातात बळी गेले. सततच्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी बायपासवरील जडवाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत प्रवेशबंदी करण्याचा ़निर्णय कालच पोलीस आयुक्तांनी घेतला. प्रायोगिक तत्त्वावर ९ सप्टेंबरपर्यंत हा आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जारी केली. जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयाचा रविवारी पहिला दिवस होता. पोलीस आयुक्तांच्या अधिसूचनेत जालना, बीडकडून येणा-या जडवाहनांना पाचोड-पैठण लिंकरोड किंवा केम्ब्रिज चौक-सावंगी बायपास- फुलंब्री-खुलताबाद-कसाबखेडा या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले. नाशिक आणि धुळ्याकडे येणा-या-जाणा-या जडवाहनांना पैठण लिंकरोड, पाचोड मार्गाचा पर्याय सुचविण्यात आला. एक तर तीन तास एकाच ठिकाणी उभे राहणे; अथवा सुमारे चाळीस ते पन्नास कि.मी. लांबीच्या पर्यायी मार्गाचा वापर करणे, असे दोन पर्याय ट्रक, हायवाचालकासमोर होते. यामुळे दुस-या पर्यायाचा वापर केल्यास अतिरिक्त इंधन खर्च होऊन ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. यामुळे जडवाहनचालकांनी रविवारी सकाळी आणि सायंकाळी त्यांचे वाहन आहे तेथे उभे केले. परिणामी, सकाळी ८ ते ११ या वेळेत एकही जडवाहन बीड बायपासने मार्गक्रमण करू शकले नाही. सकाळी ८ ते रात्री ११ या कालावधीत बीड बायपास ते केम्ब्रिज चौकाच्या पुढे आणि बीड रोडवर सुमारे दोन ते अडीच हजार ट्रक, हायवांच्या रांगा लागल्या. तसेच लिंक रोड ते पैठण रोड आणि ए.एस. क्लबच्या पुढे चार ते पाच किमी वाहने उभी होती.स्पीड गण गायब,वेगावर नियंत्रण नाहीबीड बायपास रस्त्यावरील अपघातांमध्ये बºयाचदा वाहनांचा वेग कारणीभूत असल्याचे समोर आले. सुसाट वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बायपासवर स्पीड गण बसविले होते. मात्र, वर्षभरात स्पीड गण नादुरुस्त झाल्याने बायपासवरून ही यंत्रणा गायब झाली. शिवाय आजपर्यंतच्या अपघातांना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे हे महत्त्वाचे कारण असल्याचे अधिका-यांनी नमूद केले.सर्व्हिस रोड बांधणे गरजेचेबीड बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरी वसाहती अस्तित्वात आल्या. या वसाहतींमुळे बायपास आता शहरातील मार्ग झाला. या मार्गाला सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे. सर्व्हिस रस्ता बांधल्यास या मार्गावरील अपघात रोखण्यास मदत हाईल, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी बायपासवरील सर्व्हिस रोड होत नाही.केवळ एकच लेन वाहतुकीसाठी मोकळीवाहनचालकांना बायपासवरील जडवाहनांना प्रवेशबंदीची माहिती नव्हती. यामुळे नेहमीप्रमाणे बायपासने निघालेल्या जडवाहनांना अचानक आहे तेथे थांबण्यास सांगितल्याने बायपासवरील एक लेन जडवाहनांनी व्यापली होती. परिणामी, एकच लेन वाहतुकीसाठी मोकळी होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक