शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

बीड बायपासवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:25 IST

बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवाहनांच्या सात ते आठ किलो मिटरपर्यंत रांगा लागल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवाहनांच्या सात ते आठ किलो मिटरपर्यंत रांगा लागल्या.शहराची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवर सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत जडवाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. यामुळे जडवाहने कालपर्यंत बीड बायपास रस्त्याचा वापर करीत होते. बीड बायपासवर महिनाभरात पाच जणांचे अपघातात बळी गेले. सततच्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी बायपासवरील जडवाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत प्रवेशबंदी करण्याचा ़निर्णय कालच पोलीस आयुक्तांनी घेतला. प्रायोगिक तत्त्वावर ९ सप्टेंबरपर्यंत हा आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जारी केली. जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयाचा रविवारी पहिला दिवस होता. पोलीस आयुक्तांच्या अधिसूचनेत जालना, बीडकडून येणा-या जडवाहनांना पाचोड-पैठण लिंकरोड किंवा केम्ब्रिज चौक-सावंगी बायपास- फुलंब्री-खुलताबाद-कसाबखेडा या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले. नाशिक आणि धुळ्याकडे येणा-या-जाणा-या जडवाहनांना पैठण लिंकरोड, पाचोड मार्गाचा पर्याय सुचविण्यात आला. एक तर तीन तास एकाच ठिकाणी उभे राहणे; अथवा सुमारे चाळीस ते पन्नास कि.मी. लांबीच्या पर्यायी मार्गाचा वापर करणे, असे दोन पर्याय ट्रक, हायवाचालकासमोर होते. यामुळे दुस-या पर्यायाचा वापर केल्यास अतिरिक्त इंधन खर्च होऊन ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. यामुळे जडवाहनचालकांनी रविवारी सकाळी आणि सायंकाळी त्यांचे वाहन आहे तेथे उभे केले. परिणामी, सकाळी ८ ते ११ या वेळेत एकही जडवाहन बीड बायपासने मार्गक्रमण करू शकले नाही. सकाळी ८ ते रात्री ११ या कालावधीत बीड बायपास ते केम्ब्रिज चौकाच्या पुढे आणि बीड रोडवर सुमारे दोन ते अडीच हजार ट्रक, हायवांच्या रांगा लागल्या. तसेच लिंक रोड ते पैठण रोड आणि ए.एस. क्लबच्या पुढे चार ते पाच किमी वाहने उभी होती.स्पीड गण गायब,वेगावर नियंत्रण नाहीबीड बायपास रस्त्यावरील अपघातांमध्ये बºयाचदा वाहनांचा वेग कारणीभूत असल्याचे समोर आले. सुसाट वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बायपासवर स्पीड गण बसविले होते. मात्र, वर्षभरात स्पीड गण नादुरुस्त झाल्याने बायपासवरून ही यंत्रणा गायब झाली. शिवाय आजपर्यंतच्या अपघातांना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे हे महत्त्वाचे कारण असल्याचे अधिका-यांनी नमूद केले.सर्व्हिस रोड बांधणे गरजेचेबीड बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरी वसाहती अस्तित्वात आल्या. या वसाहतींमुळे बायपास आता शहरातील मार्ग झाला. या मार्गाला सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे. सर्व्हिस रस्ता बांधल्यास या मार्गावरील अपघात रोखण्यास मदत हाईल, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी बायपासवरील सर्व्हिस रोड होत नाही.केवळ एकच लेन वाहतुकीसाठी मोकळीवाहनचालकांना बायपासवरील जडवाहनांना प्रवेशबंदीची माहिती नव्हती. यामुळे नेहमीप्रमाणे बायपासने निघालेल्या जडवाहनांना अचानक आहे तेथे थांबण्यास सांगितल्याने बायपासवरील एक लेन जडवाहनांनी व्यापली होती. परिणामी, एकच लेन वाहतुकीसाठी मोकळी होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक