शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

कौशल्य विद्यापीठाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:28 IST

शेती आणि शेतीवर आधारित ग्रामीण भागातील उद्योग वाढीसाठी मराठवाड्यात कौशल्य विद्यापीठाची शासनाकडे मागणी केली आहे. याद्वारे दहा लाख युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, कृषी संवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम यासह शेतीबरोबर निगडित उद्योग वाढीवर भर दिला जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर रविवारी ‘रुरल चेंबर आॅफ कॉमर्स’च्या उद््घाटनप्रसंगी म्हणाले.

ठळक मुद्देपुरुषोत्तम भापकर : ‘रुरल चेंबर आॅफ कॉमर्स’चे उद््घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेती आणि शेतीवर आधारित ग्रामीण भागातील उद्योग वाढीसाठी मराठवाड्यात कौशल्य विद्यापीठाची शासनाकडे मागणी केली आहे. याद्वारे दहा लाख युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, कृषी संवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम यासह शेतीबरोबर निगडित उद्योग वाढीवर भर दिला जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर रविवारी ‘रुरल चेंबर आॅफ कॉमर्स’च्या उद््घाटनप्रसंगी म्हणाले.ग्रामीण भागात नवीन उद्योग उभारले जावेत, नवीन उद्योजक निर्माण करणे, यादृष्टीने माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी रुरल चेंबर आॅफ कॉमर्सची स्थापना करण्यात आली आहे. एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. भापकर यांच्या हस्ते उद््घाटन झाले. एमआयटीचे अध्यक्ष यज्ञदेव कवडे अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय हरिजन सेवक संघाचे डॉ. शंकरकुमार सन्याल, माजी खासदार नरेश यादव, रुरल चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अतुल घुईखेडकर, उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, उद्योजक अखिलेश कटियार, राम जोगदंड, शिवाजी झोंबाडे, डॉ. अभय पाटील, राजेंद्र गावित, डॉ. विजय माने यांची उपस्थिती होती.डॉ.भापकर म्हणाले, ज्ञानाबरोबर कौशल्य आणि तंत्रज्ञान असणे गरजेचे आहे. ज्याच्याकडे या तिन्ही गोष्टी नाहीत, तो मागे पडतो. त्यामुळे या तिन्ही गोष्टी देण्याची आज गरज आहे. नॉलेज, कॉलेज आणि व्हिलेज हा एक उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीचे ज्ञान, विविध योजना, स्वयंरोजगाराच्या योजना आदींविषयी मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण उद्योग वाढीसाठी उत्पादन, मार्केटिंग आणि प्रक्रिया या गोष्टींना बळ दिले पाहिजे. शासनाकडे मराठवाड्यासाठी १ हजार गटशेतीचे उद्दिष्ट देण्याची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. सन्याल म्हणाले, खेडी पुढे गेली पाहिजे, असे महात्मा गांधी म्हणत होते. परंतु खेड्यातून लोक शहरात येतात. त्यामुळे गांधीजींचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी आता कुठेतरी पाऊल पडत आहे.ब्रँड, मार्केटिंग, समन्वयाचा अभावडॉ. विजय माने म्हणाले, ग्रामीण भागातील उद्योगांना उत्पादनापेक्षा ब्रॅडिंगवर अधिक खर्च करावा लागतो. तो अनेकांना शक्य होत नाही. ब्रँडसह मार्केटिंग, समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टींवर मात करून ग्रामीण भागात समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.बेरोजगारवाद धोकादायकदरवर्षी हजारो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. परंतु नोकरी मिळत नाही. दहशतवाद, नक्षलवादापेक्षा बेरोजगारवाद हा अधिक धोकादायक आहे. ग्रामीण भागात एमआयडीसीचे उद्योग नाहीत. ग्रामीण भागात उद्योग वाढीसाठी युवकांची मानसिकता बदलली पाहिजे, असे अतुल घुईखेडकर म्हणाले.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबाद