शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जी-२० निमीत्त युनिर्व्हसिटी कनेक्ट लेक्चर सिरीज, विविध स्पर्धा

By योगेश पायघन | Updated: February 8, 2023 19:33 IST

कुलगुरु परिषदेची जय्यत तयारी, देशभरातून ५० कुलगुरूंची नोंदणी

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘जी-२० युनिर्व्हसिटी कनेक्ट लेक्चर सिरीज’चे १७ फेब्रुवारी आयोजन करण्यात आले आहे. या परीषदेनिमीत्त शहरात येणाऱ्या पाहूण्यांसोबत विद्यापीठातील २० विद्यार्थीही असणार आहेत. तसेच पश्चिम विभागीय कुलगुरु परिषद २१ व २२ फेब्रुवारी रोजी होत असून उच्च शिक्षणाच्या पुढील दिशा कशी असेल यावर या परीषदेत मंथन होणार आहे. त्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जय्यत तयारी सुरू केली असल्याची माहीती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले, ‘जी-२०’ परिषदेनिमीत्त विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यात मराठवाडयास तसेच विद्यापीठास सहभागी करुन घेण्यात आले, ही अभिमानाची गोष्ट आहे. जी-२० परिषदेनिमित्त शाश्वत विकास, पर्यावरणस्नेही जीवन शैली, क्लायमेट चेंज व ग्लोबल सेक्युरिटी आदी विषयावर व्याख्याने होणार आहेत. यामध्ये नॅशनल रिसर्च लॅब माजी संचालक डॉ. मॅनेजरसिंग, सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रा.ज्योती चंदीरमानी आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठाच्या नाटयगृहात येत्या १७ फेब्रुवारी रोजी हे व्याख्यान होईल. या निमित्ताने १० ते ११ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वारसा याविषया प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकींग स्पर्धा, बिझनेस आयडिया कॉन्टेस्टट आदी स्पर्धा होणार आहेत. कुलसचिव डॉ.भगवान साखळे हे आयोजन समितीचे अध्यक्ष असून डॉ.मुस्तजिब खान हे नोडल ऑफीसर तर बीना सेंगर या समन्वयक असल्याचे प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले.

कुलगुरु परिषदेत मंथनअसोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हसिटीज (एआययु)ने पश्चिम विभागीय कुलगुरु परिषदेचे यजमानपद विद्यापीठाला दिले आहे. येत्या २१ व २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परिषदेच्या उद्घाटनास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर समारोपास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. एआययुचे पदाधिकारी व उच्च शिक्षण क्षेत्रातील मान्यावरांसह महाराष्ट्र, गोवा, गुजरात व राजस्थानमधील ५० कुलगुरुंनी परिषदेस नोंदणी केली असून उच्च शिक्षण आणि नव्या शैक्षणिक धोरणात पुढील दिशा याविषयावर परिषदेत १०० हून अधिक तज्ज्ञ मंथन करणार आहेत. असे कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद