शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘त्या’ महाविद्यालयावर विद्यापीठ प्रशासनाची चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 17:22 IST

सातपुडा विकास मंडळ संस्थेने २००१ मध्ये मोहाडी (ता. कन्नड) येथे वरिष्ठ कला महाविद्यालय सुरू केले. यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नता दिली. मात्र हे महाविद्यालय २००६-०७ मध्ये बंद पडले.

औरंगाबाद : बारा वर्षांपासून बंद असलेले मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय सुरू करण्यासाठी विद्यापरिषदेत ठराव घेऊन राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. या निर्णयाचा भंडाफोड ‘लोकमत’ने केला. यावर विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीत प्रा. सुनील मगरे यांनी प्रशासनाला जाब विचारला. तेव्हा कुलगुरूंसह प्रशासनातील एकानेही उत्तर दिले नाही.

सातपुडा विकास मंडळ संस्थेने २००१ मध्ये मोहाडी (ता. कन्नड) येथे वरिष्ठ कला महाविद्यालय सुरू केले. यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नता दिली. मात्र हे महाविद्यालय २००६-०७ मध्ये बंद पडले. यामुळे विद्यापीठाने २००७ ते २०११ आणि २०११ ते २०१६ च्या बृहत आराखड्यात सतत दहा वर्षे मोहाडी येथे महाविद्यालयासाठी तरतूद केली. त्यानुसार २८ एप्रिल २०१४ रोजी ग्रामीण विकास प्रसारक मंडळाच्या पद्मावती कला व विज्ञान महाविद्यालयाला परवानगी दिली. हे महाविद्यालय सुरू झाले. सातपुडा विकास मंडळ संस्थेने दहा वर्षांपासून बंद असलेले महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी २०१६ मध्ये प्रयत्न सुरू केले. यासाठी विद्यापीठातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदा पद्धतीने बंद काळातील संलग्नता शुल्कही विद्यापीठाकडे भरले. याचा भंडाफोड ‘लोकमत’ने केल्यामुळे संलग्नता देण्याविषयीच्या हालचाली थंडावल्या होत्या. मात्र जालन्यातील ‘पॉवरफुल’ नेत्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने उचल खाल्ली. दोन समित्यानंतर थेट कुलगुरूंनीच मोहाडी येथे महाविद्यालयास भेट दिली.

या भेटीनंतर झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत ठराव घेऊन राज्य सरकारकडे हे महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यास हरकत नसल्याचा प्रस्ताव पाठविला. याविषयीची कागदपत्रेही माहिती अधिकारात देण्यात येत नाहीत. २० मार्च रोजी विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीत पाच वर्षांच्या बृहत आराखड्याला मान्यता देताना प्रा. सुनील मगरे यांनी हा विषय उपस्थित केला. बंद पडलेल्या महाविद्यालयाचे संलग्नता शुल्क कोणत्या अधिकारात स्वीकारले. त्याच ठिकाणी दुसऱ्या महाविद्यालयाला परवानगी दिल्यानंतर पुन्हा बंद पडलेले महाविद्यालय कसे सुरू होऊ शकते?  यात शासनाचे नियम असलेले दोन कॉलेजमधील अंतर, गावाची लोकसंख्या, महाविद्यालयाची गरज, अशा मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष कशामुळे करण्यात आले, असे विविध प्रश्न उपस्थित केले. मात्र यावर अधिसभेचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यासह प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने उत्तर न देता चुप्पी साधली. यामुळे याविषयी उलटसुलट चर्चा अद्यापही सुरू आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादcollegeमहाविद्यालयRegistrarकुलसचिव