शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी सर्वंकष विमा योजना!

By admin | Updated: April 25, 2016 00:33 IST

अंबड : आतापर्यंतच्या कृषिविमा योजनेतील सर्व त्रुटी दूर करुन शेतकऱ्यांसाठी सर्वंकष कृषि विमा योजना नव्या स्वरुपाने आणण्यात आली असून

अंबड : आतापर्यंतच्या कृषिविमा योजनेतील सर्व त्रुटी दूर करुन शेतकऱ्यांसाठी सर्वंकष कृषि विमा योजना नव्या स्वरुपाने आणण्यात आली असून ती शेतकऱ्यांच्या सर्वाधिक फायद्याची आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलाच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथे केले.ग्राम किसान सभेस संबोधित कररताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच पांडुरंग घुले होते. पेरणीपासून तर काढणी पश्चातही १५ दिवसांपर्यंत पिकास विमा संरक्षण मिळणार असल्याचे सांगून दशरथ तांभाळे म्हणाले की, वैयक्तिक शेतकऱ्यासही विमा योजनेचा फायदा मिळू शकणार आहे. या अगोदर या योजनेचा फायदा मंडळातील सर्व गावांना होणाऱ्या नुकसानीच्या सरासरीवर मिळत होता. त्यामुळे कधी एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान होवूनही त्यास विमा मिळत नसे; पण ही त्रुटी आता दूर करण्यात आली आहे. प्रत्येक पिकास असलेला वेगवेगळा विमा दर बदलून आता एक हंगाम एक दर अशा पध्दतीत खरीप पिकासाठी सरसकट २ टक्के तर रब्बी पिकासाठी १.५ टक्के विमादर ठेवण्यात आला आहे. पिक विम्यासाठीचा हा सर्वात कमी दर आहे. प्रास्ताविकात कृषि अधिकारी बाळसागर तौर म्हणाले की, कृषि विषयक विविध योजनांची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी या ग्राम कृषि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनांचा शेतकऱ्यांनी गरजेनुसार उपयोग घ्यावा, असे तौर म्हणाले. यावेळी तांभाळे यांच्या हस्ते जमिन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, संभाप्पा स्वामी, वैशाली कांबळे यांच्यासह सुधाकर वाघ, बोंगाने, ज्ञानेश्वर जगताप, कैलास वाघ, उध्दव घुगे, परसराम बरबडे, संतोष आव्हाड, राजू सोनवणे, संजय किर्तनकार, मिथून पाटील, सुरेश डुकरे, एस. डी. पालवे आदींनी परिश्रम घेतले.