शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

शेतीसाठी सर्वंकष विमा योजना!

By admin | Updated: April 25, 2016 00:33 IST

अंबड : आतापर्यंतच्या कृषिविमा योजनेतील सर्व त्रुटी दूर करुन शेतकऱ्यांसाठी सर्वंकष कृषि विमा योजना नव्या स्वरुपाने आणण्यात आली असून

अंबड : आतापर्यंतच्या कृषिविमा योजनेतील सर्व त्रुटी दूर करुन शेतकऱ्यांसाठी सर्वंकष कृषि विमा योजना नव्या स्वरुपाने आणण्यात आली असून ती शेतकऱ्यांच्या सर्वाधिक फायद्याची आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलाच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथे केले.ग्राम किसान सभेस संबोधित कररताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच पांडुरंग घुले होते. पेरणीपासून तर काढणी पश्चातही १५ दिवसांपर्यंत पिकास विमा संरक्षण मिळणार असल्याचे सांगून दशरथ तांभाळे म्हणाले की, वैयक्तिक शेतकऱ्यासही विमा योजनेचा फायदा मिळू शकणार आहे. या अगोदर या योजनेचा फायदा मंडळातील सर्व गावांना होणाऱ्या नुकसानीच्या सरासरीवर मिळत होता. त्यामुळे कधी एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान होवूनही त्यास विमा मिळत नसे; पण ही त्रुटी आता दूर करण्यात आली आहे. प्रत्येक पिकास असलेला वेगवेगळा विमा दर बदलून आता एक हंगाम एक दर अशा पध्दतीत खरीप पिकासाठी सरसकट २ टक्के तर रब्बी पिकासाठी १.५ टक्के विमादर ठेवण्यात आला आहे. पिक विम्यासाठीचा हा सर्वात कमी दर आहे. प्रास्ताविकात कृषि अधिकारी बाळसागर तौर म्हणाले की, कृषि विषयक विविध योजनांची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी या ग्राम कृषि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनांचा शेतकऱ्यांनी गरजेनुसार उपयोग घ्यावा, असे तौर म्हणाले. यावेळी तांभाळे यांच्या हस्ते जमिन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, संभाप्पा स्वामी, वैशाली कांबळे यांच्यासह सुधाकर वाघ, बोंगाने, ज्ञानेश्वर जगताप, कैलास वाघ, उध्दव घुगे, परसराम बरबडे, संतोष आव्हाड, राजू सोनवणे, संजय किर्तनकार, मिथून पाटील, सुरेश डुकरे, एस. डी. पालवे आदींनी परिश्रम घेतले.