शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

बिया गोळा करण्याचा जोपासला अनोखा छंद

By admin | Updated: May 13, 2017 21:44 IST

बीड :बीडमध्ये मात्र, तीन बालमित्र वेगळ्याच कामात व्यस्त आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी वर्गशिक्षकाकडून प्रेरणा घेत हे त्रिकूट बिया गोळा करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शाळा, शिकवणी व अभ्यास यामुळे वर्षभर व्यस्त असलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीची प्रचंड उत्सुकता असते. धम्माल मस्ती, मौजमजा, आंब्यावर ताव अन् तासन्तास मैदानावर घालवत सुटीचा मनसोक्त आनंद लुटण्याचा बहुतांश बच्चेकंपनीचा बेत असतो. बीडमध्ये मात्र, तीन बालमित्र वेगळ्याच कामात व्यस्त आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी वर्गशिक्षकाकडून प्रेरणा घेत हे त्रिकूट बिया गोळा करत आहेत. या अनोख्या उपक्रमातून सुटीचा सदुपयोग कसा करता येतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.ऋषिकेश देशपांडे, नंदन कुलकर्णी व गौरव देशपांडे अशी या तीन दोस्तांची नावे. बीडमधील चंपावती विद्यालयात शिकणाऱ्या ऋषीकेशने सातवी तर नंदन व गौरवने अनुक्रमे आठवीची परीक्षा दिली आहे. तिघेही पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अभ्यासात हुशार असलेल्या या तिघांवर शिक्षक रमेश जाधव यांचा प्रचंड प्रभाव आहे. जाधव हे वृक्षमित्र म्हणून ओळखले जातात. ५ सप्टेंबर २०१६ पासून ते रोज एक झाड लावतात. शेवटच्या श्वासापर्यंत ‘एक दिवस- एक वृक्षारोपण’ असा संकल्प त्यांनी स्वीकारलेला आहे. उन्हाळी सुटीत मौजमजा तर करायचीच, पण सोबत शिक्षक जाधव यांच्याप्रमाणे वृक्षारोपणासाठी काही तरी विधायक उपक्रम हाती घेण्याचा संकल्प त्यांनी केला. ऋषीकेश देशपांडे याने बिया गोळा करुन पहिल्या पावसानंतर त्याची लागवड करण्याची कल्पना मांडली. ती नंदन कुलकर्णी व गौरव देशपांडे याने उचलून धरली. महाराष्ट्र दिनापासून हे तिघे बिया जमा करण्याच्या कामाला लागले. गल्लीतील प्रत्येक घरी जाऊन ते बिया जमा करतात. शिवाय नातेवाईक व मित्रपरिवारालाही ते बिया उपलब्ध करण्याची मागणी करत आहेत. ‘दुष्काळावर मात करुया’ या शिर्षकाखाली त्यांनी पत्रक छापून गल्लीतील भिंतीवर डकवले. त्यामुळे लोक आता स्वत:हून त्यांना बिया आणून देत आहेत. तिघांचे कुटुंबही त्यांना या कामी सहकार्य करत असून वृक्षारोपणासाठी त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे त्यांनाही मोठे अप्रूप वाटते.