शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

बिया गोळा करण्याचा जोपासला अनोखा छंद

By admin | Updated: May 13, 2017 21:44 IST

बीड :बीडमध्ये मात्र, तीन बालमित्र वेगळ्याच कामात व्यस्त आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी वर्गशिक्षकाकडून प्रेरणा घेत हे त्रिकूट बिया गोळा करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शाळा, शिकवणी व अभ्यास यामुळे वर्षभर व्यस्त असलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीची प्रचंड उत्सुकता असते. धम्माल मस्ती, मौजमजा, आंब्यावर ताव अन् तासन्तास मैदानावर घालवत सुटीचा मनसोक्त आनंद लुटण्याचा बहुतांश बच्चेकंपनीचा बेत असतो. बीडमध्ये मात्र, तीन बालमित्र वेगळ्याच कामात व्यस्त आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी वर्गशिक्षकाकडून प्रेरणा घेत हे त्रिकूट बिया गोळा करत आहेत. या अनोख्या उपक्रमातून सुटीचा सदुपयोग कसा करता येतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.ऋषिकेश देशपांडे, नंदन कुलकर्णी व गौरव देशपांडे अशी या तीन दोस्तांची नावे. बीडमधील चंपावती विद्यालयात शिकणाऱ्या ऋषीकेशने सातवी तर नंदन व गौरवने अनुक्रमे आठवीची परीक्षा दिली आहे. तिघेही पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अभ्यासात हुशार असलेल्या या तिघांवर शिक्षक रमेश जाधव यांचा प्रचंड प्रभाव आहे. जाधव हे वृक्षमित्र म्हणून ओळखले जातात. ५ सप्टेंबर २०१६ पासून ते रोज एक झाड लावतात. शेवटच्या श्वासापर्यंत ‘एक दिवस- एक वृक्षारोपण’ असा संकल्प त्यांनी स्वीकारलेला आहे. उन्हाळी सुटीत मौजमजा तर करायचीच, पण सोबत शिक्षक जाधव यांच्याप्रमाणे वृक्षारोपणासाठी काही तरी विधायक उपक्रम हाती घेण्याचा संकल्प त्यांनी केला. ऋषीकेश देशपांडे याने बिया गोळा करुन पहिल्या पावसानंतर त्याची लागवड करण्याची कल्पना मांडली. ती नंदन कुलकर्णी व गौरव देशपांडे याने उचलून धरली. महाराष्ट्र दिनापासून हे तिघे बिया जमा करण्याच्या कामाला लागले. गल्लीतील प्रत्येक घरी जाऊन ते बिया जमा करतात. शिवाय नातेवाईक व मित्रपरिवारालाही ते बिया उपलब्ध करण्याची मागणी करत आहेत. ‘दुष्काळावर मात करुया’ या शिर्षकाखाली त्यांनी पत्रक छापून गल्लीतील भिंतीवर डकवले. त्यामुळे लोक आता स्वत:हून त्यांना बिया आणून देत आहेत. तिघांचे कुटुंबही त्यांना या कामी सहकार्य करत असून वृक्षारोपणासाठी त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे त्यांनाही मोठे अप्रूप वाटते.