शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

ऊस लागवडीसाठी अनोखे जुगाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:02 IST

शेतीला लागणारा वाढता खर्च आणि मजुरांच्या टंचाईमुळे वैतागलेल्या अगरवाडगाव येथील पठाण बंधंूनी ऊस लागवडीसाठी अनोखे जुगाड जमविले. परिसरात पठाण बंधूंनी केलेल्या ऊस लागवडीच्या नवीन उपायाने शेतकºयांना नवीन तंत्र माहिती झाले आहे. येत्या काळात या बंधूंनी वापरलेले जुगाड इतरही शेतकरी वापरतील, अशी शक्यता आहे.

तारेख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककायगाव : शेतीला लागणारा वाढता खर्च आणि मजुरांच्या टंचाईमुळे वैतागलेल्या अगरवाडगाव येथील पठाण बंधंूनी ऊस लागवडीसाठी अनोखे जुगाड जमविले. परिसरात पठाण बंधूंनी केलेल्या ऊस लागवडीच्या नवीन उपायाने शेतकºयांना नवीन तंत्र माहिती झाले आहे. येत्या काळात या बंधूंनी वापरलेले जुगाड इतरही शेतकरी वापरतील, अशी शक्यता आहे.गंगापूर तालुक्यातील अगरवाडगाव येथील उस्मान पठाण यांच्या कुटुंबातील सुभान, अस्लम, आजम आणि अक्रम ही भावंडे शेती व्यवसाय करतात. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने शेती करून वर्षाच्या शेवटी हाती फारसे काही शिल्लक राहत नसल्याने पठाण कुटुंबिय त्रस्त झाले होते. त्यामुळे यावर्षी शेती करताना काहीतरी नवीन करून शेती परवडेल यासाठी उपाययोजना करण्याचे सर्वांनी ठरविले.उसाच्या लागवडीसाठी एकरी तीन ते चार हजारांचा खर्च आणि मजुरांची टंचाई यावर काय मार्ग काढता येईल, याबाबत सगळेजण विचार करू लागले. पारंपारिक पद्धतीने उसाची लागवड करताना मजुरांच्या हाताने ऊस तोडणे, सरीत ऊस नेऊन टाकणे आणि लागवडीसाठी बेणे पसरविणे आदी कामे मजुरांच्या हाताने करावी लागतात.मात्र पठाण बंधंूनी यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने लागवड करण्याचे जुगाड जमविले. सर्वप्रथम उसाचे बेणे तोडून एका ठिकाणी जमा केले. नंतर त्याचे लागवडीयोग्य तुकडे करून ट्रॅक्टरच्या मागील बाजूस ठेवले. एकाने लागवड करायची आहे . त्या सरीत ट्रॅक्टर चालवायचा, दोघांनी ट्रॅक्टरच्या मागील रेजरवर बसून सरीत एक-एक करून उसाचे टिपरु मातीत लावत चालायचे आणि एकाने उसाचे टिपरू ट्रॅक्टरपर्यंत आणून द्यायचे. या पद्धतीने उसाची लागवड केली.पाच मजुरांना किमान आठ दिवस जाणारी लागवड या नवीन तंत्राने अवघ्या दोन दिवसांत उरकली. ट्रॅक्टर आणि लागवड करणारे घरचेच असल्याने खर्चाचाही विषय आला नाही. याच ऊस लागवडीसाठी मजुरांना किमान पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आला असता. हा सर्व खर्च आणि वेळ यामुळे वाचला.पठाण बंधूंनी लागवडीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती परिसरात पोहोचताच अनेकांनी लागवड सुरू असलेल्या शेताला भेट दिली. एवढ्या सोप्या आणि सुटसुटीत असणाºया तंत्राने लागवड करणे आपल्यालाही जमेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.शेतकºयांनी शेती करताना पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड दिली तर शेती करणे सोपे आणि सुटसुटीत होते, असे पठाण कुटुंबिय सांगतात. लागवडीसाठी लागणारा खर्च वाचला, आता तोच पैसा खतासाठी वापरता येईल. त्यामुळे उसाच्या उत्पादनात वाढ करणे शक्य होईल. येत्या काळात शेतीत आणखी काय नवीन करता येईल, यासाठी सगळेजण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.