शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे विचार समजून घ्या -बाली

By admin | Updated: March 19, 2016 20:16 IST

हिंगोली : जातपात, भाषा व प्रांत मतभेद विसरून प्रत्येकाने बाबासाहेबांना व संविधानाला समजून घेणे काळाची गरज आहे.

हिंगोली : जातपात, भाषा व प्रांत मतभेद विसरून प्रत्येकाने बाबासाहेबांना व संविधानाला समजून घेणे काळाची गरज आहे. त्याशिवाय देशातील विषमता नष्ट होणार नसल्याचे आॅल इंडिया समता सैनिक दलाचे प्रमुख मार्गदर्शक एल. आर. बाली यांनी शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. बाली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत काम केलेले असून जवळपास २०० च्यावर विविध पुस्तके लिहिली आहेत. डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाची धुरा आजही वयाच्या ८६ व्या वर्षी बाली न थकता मोठ्या उत्साहाने देशभर फिरून सांभाळत आहेत. बाली म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला एका ठरावीक प्रांत किंवा जातीची ओळख कधीच दाखविली नाही. ते म्हणत मी प्रथम भारतीय आहे. बाबासाहेबांनी नेहमीच देशभक्तीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे प्रत्येकानेच देशभक्त असल्याची भावना जपायला हवी. प्रत्येक नागरिकांनी तसेच तरूणाईने बाबासाहेबांचे विचार अंगीकारणे आवश्यक असून त्यांचा वसा जपण्याचे काम करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समाजाची निर्मितीचे काम व त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. ते म्हणाले, कुठल्याही समाजाने जाती-उपजातीमध्ये गुरफटून राहू नये. चळवळीविषयी त्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीची सध्या लोकांनी दुकानदारी मांडली आहे. अशा लोकांना धडा शिकविण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या संविधानाची चोख अंमलबजावणी झाल्यास देशात शांतता टिकून राहील. परंतु असे होताना मात्र दिसून येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)