शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

बाबासाहेबांचे विचार समजून घ्या -बाली

By admin | Updated: March 19, 2016 20:16 IST

हिंगोली : जातपात, भाषा व प्रांत मतभेद विसरून प्रत्येकाने बाबासाहेबांना व संविधानाला समजून घेणे काळाची गरज आहे.

हिंगोली : जातपात, भाषा व प्रांत मतभेद विसरून प्रत्येकाने बाबासाहेबांना व संविधानाला समजून घेणे काळाची गरज आहे. त्याशिवाय देशातील विषमता नष्ट होणार नसल्याचे आॅल इंडिया समता सैनिक दलाचे प्रमुख मार्गदर्शक एल. आर. बाली यांनी शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. बाली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत काम केलेले असून जवळपास २०० च्यावर विविध पुस्तके लिहिली आहेत. डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाची धुरा आजही वयाच्या ८६ व्या वर्षी बाली न थकता मोठ्या उत्साहाने देशभर फिरून सांभाळत आहेत. बाली म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला एका ठरावीक प्रांत किंवा जातीची ओळख कधीच दाखविली नाही. ते म्हणत मी प्रथम भारतीय आहे. बाबासाहेबांनी नेहमीच देशभक्तीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे प्रत्येकानेच देशभक्त असल्याची भावना जपायला हवी. प्रत्येक नागरिकांनी तसेच तरूणाईने बाबासाहेबांचे विचार अंगीकारणे आवश्यक असून त्यांचा वसा जपण्याचे काम करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समाजाची निर्मितीचे काम व त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. ते म्हणाले, कुठल्याही समाजाने जाती-उपजातीमध्ये गुरफटून राहू नये. चळवळीविषयी त्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीची सध्या लोकांनी दुकानदारी मांडली आहे. अशा लोकांना धडा शिकविण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या संविधानाची चोख अंमलबजावणी झाल्यास देशात शांतता टिकून राहील. परंतु असे होताना मात्र दिसून येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)