शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत औरंगाबादमधील १४८ कोटींच्या निविदांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 17:58 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १४८ कोटी रुपयांची विविध विकास कामे महापालिकेला करायची आहेत. या कामांच्या निविदा कोणी काढाव्यात यावरून वाद निर्माण झाला होता. शासनाच्या आयटी कॉर्पोरेशनने या कामांवर दावा केला होता. शुक्रवारी स्मार्ट सिटी मिशनच्या संचालकांनी महापालिकेनेच या निविदा प्रसिद्ध कराव्यात, असे आदेश दिले.

ठळक मुद्देशहरात १९०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही लावणे, बसस्थानक अद्ययावत करणे, विविध भागांत वायफाय यंत्रणा उभारणे, आदी कामे १४८ कोटी रुपयांमध्ये करण्यात येणार आहेत. या कामांच्या निविदा आयटी कॉर्पोरेशनमार्फत काढाव्यात असा आदेश शासनाच्या आयटी विभागाने मनपाला दिला होता.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १४८ कोटी रुपयांची विविध विकास कामे महापालिकेला करायची आहेत. या कामांच्या निविदा कोणी काढाव्यात यावरून वाद निर्माण झाला होता. शासनाच्या आयटी कॉर्पोरेशनने या कामांवर दावा केला होता. शुक्रवारी स्मार्ट सिटी मिशनच्या संचालकांनी महापालिकेनेच या निविदा प्रसिद्ध कराव्यात, असे आदेश दिले.

शहरात १९०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही लावणे, बसस्थानक अद्ययावत करणे, विविध भागांत वायफाय यंत्रणा उभारणे, आदी कामे १४८ कोटी रुपयांमध्ये करण्यात येणार आहेत. या कामांचे सर्व डीपीआर तयार आहेत. ३१ जानेवारी रोजी स्मार्ट सिटीच्या बैठकीत या कामांना अंतिम मंजुरी मिळणार आहे. या कामांच्या निविदा आयटी कॉर्पोरेशनमार्फत काढाव्यात असा आदेश शासनाच्या आयटी विभागाने मनपाला दिला होता. त्वरित ७० कोटी रुपये आयटी कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित करावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. या मागणीला मनपाच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार विरोधही दर्शविला होता. स्मार्ट सिटीसाठी नेमण्यात आलेल्या एसपीव्हीने मिशनच्या संचालकांचे मार्गदर्शन केले. शुक्रवारी त्यांनी ही सर्व कामे एसपीव्हीमार्फतच करावीत, असे आदेश दिले. 

स्मार्ट सिटी मिशनचे संचालक समीर शर्मा यांनी ही कामे एसपीव्हीमार्फ त करण्यात यावीत, असे पत्र नगर विकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना दिले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतील १४८ कोटींच्या कामांच्या निविदा काढण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद