शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ६० हजार जोडण्या कापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:08 IST

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत चार परिमंडळांमध्ये घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे १९ लाख २५ हजार, तर ४१५ ग्राहकांकडे तब्बल १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सातत्याने वाढत चालेल्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड या परिमंडळांतील ५९ हजार ४६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहावितरण : १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत चार परिमंडळांमध्ये घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे १९ लाख २५ हजार, तर ४१५ ग्राहकांकडे तब्बल १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सातत्याने वाढत चालेल्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड या परिमंडळांतील ५९ हजार ४६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.यासंदर्भात प्रादेशिक कार्यालयाचे म्हणणे आहे की, बहुतांश ग्राहकांची वीज बिल भरण्याची मानसिकता नाही. त्यामुळे थकबाकीची आकडेवारी सातत्याने वाढत चालली आहे. महावितरणसमोर आता वीज बिल वसुलीशिवाय दुसरा पर्याय नाही. या मोहिमेत १० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक व अन्य थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत ४४ हजार ९१९ ग्राहकांकडून ७२ कोटी १० लाख रुपये एवढी वीज बिलांची वसुली करण्यात आली आहे.प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद परिमंडळाच्या ३ लाख ९९ हजार ३३८ ग्राहकांकडे २१५ कोटी ५ लाख रुपये, जळगाव परिमंडळातील ४ लाख ८२ हजार २४५ ग्राहकांकडे १८१ कोटी २६ लाख रुपये, लातूर परिमंडळात ४ लाख ९४ हजार ८७१ ग्राहकांकडे ६३५ कोटी ६ लाख रुपये, तर नांदेड परिमंडळात ५ लाख ४८ हजार ९६१ ग्राहकांकडे ४६७ कोटी ९२ लाख रुपये, अशी एकूण १९ लाख २५ हजार ४१५ ग्राहकांकडे १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १५ हजार ९३८ वीज जोडण्या असून, यांच्याकडे ६९१ कोटी ३२ लाख रुपये, तर पथदिव्यांच्या २१ हजार ४८ वीज जोडण्यांकडे १ हजार ४५९ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी आहे.थकबाकी वसुलीसाठी पथके दारोदारीमहावितरणकडून राबविण्यात येणाºया शून्य थकबाकी मोहिमेंतर्गत वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेत अभियंते व कर्मचाºयांची पथके दारोदारी जाऊन थकबाकीची वसुली करीत आहेत. जे थकबाकीदार ग्राहक प्रतिसाद देत नाहीत, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या शाखा व उपविभागीय कार्यालयात वीज बिलांच्या दुरुस्तीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ज्या ग्राहकांच्या वीज बिलांसंदर्भात तक्रारी असतील, अशा ग्राहकांनी जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.