शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ६० हजार जोडण्या कापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:08 IST

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत चार परिमंडळांमध्ये घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे १९ लाख २५ हजार, तर ४१५ ग्राहकांकडे तब्बल १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सातत्याने वाढत चालेल्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड या परिमंडळांतील ५९ हजार ४६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहावितरण : १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत चार परिमंडळांमध्ये घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे १९ लाख २५ हजार, तर ४१५ ग्राहकांकडे तब्बल १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सातत्याने वाढत चालेल्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड या परिमंडळांतील ५९ हजार ४६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.यासंदर्भात प्रादेशिक कार्यालयाचे म्हणणे आहे की, बहुतांश ग्राहकांची वीज बिल भरण्याची मानसिकता नाही. त्यामुळे थकबाकीची आकडेवारी सातत्याने वाढत चालली आहे. महावितरणसमोर आता वीज बिल वसुलीशिवाय दुसरा पर्याय नाही. या मोहिमेत १० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक व अन्य थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत ४४ हजार ९१९ ग्राहकांकडून ७२ कोटी १० लाख रुपये एवढी वीज बिलांची वसुली करण्यात आली आहे.प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद परिमंडळाच्या ३ लाख ९९ हजार ३३८ ग्राहकांकडे २१५ कोटी ५ लाख रुपये, जळगाव परिमंडळातील ४ लाख ८२ हजार २४५ ग्राहकांकडे १८१ कोटी २६ लाख रुपये, लातूर परिमंडळात ४ लाख ९४ हजार ८७१ ग्राहकांकडे ६३५ कोटी ६ लाख रुपये, तर नांदेड परिमंडळात ५ लाख ४८ हजार ९६१ ग्राहकांकडे ४६७ कोटी ९२ लाख रुपये, अशी एकूण १९ लाख २५ हजार ४१५ ग्राहकांकडे १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १५ हजार ९३८ वीज जोडण्या असून, यांच्याकडे ६९१ कोटी ३२ लाख रुपये, तर पथदिव्यांच्या २१ हजार ४८ वीज जोडण्यांकडे १ हजार ४५९ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी आहे.थकबाकी वसुलीसाठी पथके दारोदारीमहावितरणकडून राबविण्यात येणाºया शून्य थकबाकी मोहिमेंतर्गत वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेत अभियंते व कर्मचाºयांची पथके दारोदारी जाऊन थकबाकीची वसुली करीत आहेत. जे थकबाकीदार ग्राहक प्रतिसाद देत नाहीत, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या शाखा व उपविभागीय कार्यालयात वीज बिलांच्या दुरुस्तीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ज्या ग्राहकांच्या वीज बिलांसंदर्भात तक्रारी असतील, अशा ग्राहकांनी जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.