शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ६० हजार जोडण्या कापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:08 IST

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत चार परिमंडळांमध्ये घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे १९ लाख २५ हजार, तर ४१५ ग्राहकांकडे तब्बल १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सातत्याने वाढत चालेल्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड या परिमंडळांतील ५९ हजार ४६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहावितरण : १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत चार परिमंडळांमध्ये घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे १९ लाख २५ हजार, तर ४१५ ग्राहकांकडे तब्बल १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सातत्याने वाढत चालेल्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड या परिमंडळांतील ५९ हजार ४६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.यासंदर्भात प्रादेशिक कार्यालयाचे म्हणणे आहे की, बहुतांश ग्राहकांची वीज बिल भरण्याची मानसिकता नाही. त्यामुळे थकबाकीची आकडेवारी सातत्याने वाढत चालली आहे. महावितरणसमोर आता वीज बिल वसुलीशिवाय दुसरा पर्याय नाही. या मोहिमेत १० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक व अन्य थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत ४४ हजार ९१९ ग्राहकांकडून ७२ कोटी १० लाख रुपये एवढी वीज बिलांची वसुली करण्यात आली आहे.प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद परिमंडळाच्या ३ लाख ९९ हजार ३३८ ग्राहकांकडे २१५ कोटी ५ लाख रुपये, जळगाव परिमंडळातील ४ लाख ८२ हजार २४५ ग्राहकांकडे १८१ कोटी २६ लाख रुपये, लातूर परिमंडळात ४ लाख ९४ हजार ८७१ ग्राहकांकडे ६३५ कोटी ६ लाख रुपये, तर नांदेड परिमंडळात ५ लाख ४८ हजार ९६१ ग्राहकांकडे ४६७ कोटी ९२ लाख रुपये, अशी एकूण १९ लाख २५ हजार ४१५ ग्राहकांकडे १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १५ हजार ९३८ वीज जोडण्या असून, यांच्याकडे ६९१ कोटी ३२ लाख रुपये, तर पथदिव्यांच्या २१ हजार ४८ वीज जोडण्यांकडे १ हजार ४५९ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी आहे.थकबाकी वसुलीसाठी पथके दारोदारीमहावितरणकडून राबविण्यात येणाºया शून्य थकबाकी मोहिमेंतर्गत वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेत अभियंते व कर्मचाºयांची पथके दारोदारी जाऊन थकबाकीची वसुली करीत आहेत. जे थकबाकीदार ग्राहक प्रतिसाद देत नाहीत, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या शाखा व उपविभागीय कार्यालयात वीज बिलांच्या दुरुस्तीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ज्या ग्राहकांच्या वीज बिलांसंदर्भात तक्रारी असतील, अशा ग्राहकांनी जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.