शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

उमरग्यात बोंबाबोब आंदोलन

By admin | Updated: May 6, 2017 00:15 IST

उमरगा : शहराच्या हद्दवाढीनंतर तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात सर्वच महसुली क्षेत्र घेण्यात आल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ग्रीन बेल्टमध्ये आरक्षित झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क उमरगा : शहराच्या हद्दवाढीनंतर तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात सर्वच महसुली क्षेत्र घेण्यात आल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ग्रीन बेल्टमध्ये आरक्षित झाल्या आहेत. नव्या डी.पी. प्लॅनला १९७ लोकांनी आक्षेप नोंदविला होता. त्यापैकी १५६ तक्रारींची सुनावणी ४ व ५ रोजी नगरपालिकेत घेण्यात आली. यावेळी सूचना व हरकती नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान, या आराखड्याला विरोध दर्शवित विरोधकांनी बोंबाबोंब आंदोलन केले़ सदरची सुनावणीसाठी एक शासकीय अधिकारी गैरहजर असल्याने रा. अ. घालवाडकर व शे. द. चव्हाण, सेवानिवृत्त रचनाकार, नगर रचना विभाग, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड व नगरसेवक अतीक मुन्सी या सहा जणांनी सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान घेण्यात आलेले आक्षेप व त्यावर समितीने नोंदविलेले मत याचा अहवाल नगरविकास खात्याकडे पाठविण्यात येणार आहे. उमरगा शहराची हद्दवाढ २०१४ साली नगरविकास विभागाने मंजूर केली आहे. शहराच्या चारही दिशा असलेले संपूर्ण महसुली क्षेत्र हद्दवाढीत आले. त्याप्रमाणे नवीन विकास आराखडाही तयार करण्यात आला. शहराच्या नवीन विकासासाठी हा आराखडा तयार करण्यात आला होता. नवीन विकास आराखड्यात बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी ग्रीन बेल्टमध्ये आल्याने या जमिनीवर बांधकाम करणे किंवा जमिनी विकता येणार नाही. त्यामुळे संबंधितांनी ‘यलो बेल्ट’ घरगुती वापरासाठी या जमिनी हव्या आहेत, अशा तक्रारी नोंदविलेल्या आहेत, तर अनेक शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणच्या जमिनी विविध विकास कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातून डी. पी. प्लॅनचे रस्ते आहेत, त्याला बहुतांश शेतकऱ्यांचा आक्षेप असल्याने विविध स्वरुपातील १९७ लोकांनी आक्षेपाच्या तक्रारी पालिकेकडे नोंदवल्या होत्या. सदरचा डी. पी. प्लॅन कायम करणेबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे़ पण मागील पंचवार्षिकमध्ये सत्ताधारी राहिलेल्या व हद्दवाढ केलेल्या शिवसेनेने हद्दवाढीचा मोठा गाजावाजा केला होता. तीच शिवसेना आता राष्ट्रवादीला सोबत घेत हद्दवाढ चुकीच्या पद्धतीने झाली आहे म्हणून याला टोकाचा विरोध करताना दिसत आहे़ शुक्रवारी नगरपालिकेसमोर शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या हद्दवाढीला विरोध दर्शवित बोंबाबोंब आंदोलनही केले. शहराचा पुढील ५० वर्षांत होणारा विस्तार, लोकसंख्या गृहीत धरून हा विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यावेळी शिवसेनेचे नेते सांगत होते़ मात्र आता सत्तेतून हद्दपार झाल्यानंतर मात्र त्यांनीच केलेल्या विकास आराखड्याविरोधात बोंबाबोंब आंदोलन केल्याने शहरवासीयांत मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.