शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उमरग्यात बोंबाबोब आंदोलन

By admin | Updated: May 6, 2017 00:15 IST

उमरगा : शहराच्या हद्दवाढीनंतर तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात सर्वच महसुली क्षेत्र घेण्यात आल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ग्रीन बेल्टमध्ये आरक्षित झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क उमरगा : शहराच्या हद्दवाढीनंतर तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात सर्वच महसुली क्षेत्र घेण्यात आल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ग्रीन बेल्टमध्ये आरक्षित झाल्या आहेत. नव्या डी.पी. प्लॅनला १९७ लोकांनी आक्षेप नोंदविला होता. त्यापैकी १५६ तक्रारींची सुनावणी ४ व ५ रोजी नगरपालिकेत घेण्यात आली. यावेळी सूचना व हरकती नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान, या आराखड्याला विरोध दर्शवित विरोधकांनी बोंबाबोंब आंदोलन केले़ सदरची सुनावणीसाठी एक शासकीय अधिकारी गैरहजर असल्याने रा. अ. घालवाडकर व शे. द. चव्हाण, सेवानिवृत्त रचनाकार, नगर रचना विभाग, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड व नगरसेवक अतीक मुन्सी या सहा जणांनी सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान घेण्यात आलेले आक्षेप व त्यावर समितीने नोंदविलेले मत याचा अहवाल नगरविकास खात्याकडे पाठविण्यात येणार आहे. उमरगा शहराची हद्दवाढ २०१४ साली नगरविकास विभागाने मंजूर केली आहे. शहराच्या चारही दिशा असलेले संपूर्ण महसुली क्षेत्र हद्दवाढीत आले. त्याप्रमाणे नवीन विकास आराखडाही तयार करण्यात आला. शहराच्या नवीन विकासासाठी हा आराखडा तयार करण्यात आला होता. नवीन विकास आराखड्यात बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी ग्रीन बेल्टमध्ये आल्याने या जमिनीवर बांधकाम करणे किंवा जमिनी विकता येणार नाही. त्यामुळे संबंधितांनी ‘यलो बेल्ट’ घरगुती वापरासाठी या जमिनी हव्या आहेत, अशा तक्रारी नोंदविलेल्या आहेत, तर अनेक शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणच्या जमिनी विविध विकास कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातून डी. पी. प्लॅनचे रस्ते आहेत, त्याला बहुतांश शेतकऱ्यांचा आक्षेप असल्याने विविध स्वरुपातील १९७ लोकांनी आक्षेपाच्या तक्रारी पालिकेकडे नोंदवल्या होत्या. सदरचा डी. पी. प्लॅन कायम करणेबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे़ पण मागील पंचवार्षिकमध्ये सत्ताधारी राहिलेल्या व हद्दवाढ केलेल्या शिवसेनेने हद्दवाढीचा मोठा गाजावाजा केला होता. तीच शिवसेना आता राष्ट्रवादीला सोबत घेत हद्दवाढ चुकीच्या पद्धतीने झाली आहे म्हणून याला टोकाचा विरोध करताना दिसत आहे़ शुक्रवारी नगरपालिकेसमोर शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या हद्दवाढीला विरोध दर्शवित बोंबाबोंब आंदोलनही केले. शहराचा पुढील ५० वर्षांत होणारा विस्तार, लोकसंख्या गृहीत धरून हा विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यावेळी शिवसेनेचे नेते सांगत होते़ मात्र आता सत्तेतून हद्दपार झाल्यानंतर मात्र त्यांनीच केलेल्या विकास आराखड्याविरोधात बोंबाबोंब आंदोलन केल्याने शहरवासीयांत मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.