शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

दोन हजारांवर शिक्षकांचे ‘स्थायित्व’ टांगणीला !

By admin | Updated: October 22, 2014 01:18 IST

उस्मानाबाद : एखाद्या शिक्षकाची तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला दायित्वाचा लाभ (सेवेत कायम) देणे बंधनकारक आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेतंर्गतच्या

उस्मानाबाद : एखाद्या शिक्षकाची तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला दायित्वाचा लाभ (सेवेत कायम) देणे बंधनकारक आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेतंर्गतच्या १ हजार ११५ शिक्षकांच्या दायित्वाची संचिका मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीकडून जानेवारी २०१३ पासून याबाबतीत पाठपुरावा केला जात आहे. मात्र वर्षभरानंतरही हा प्रश्न निकाली निघालेला नाही.एकीकडे जिल्हा परिषद प्रशासन गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र दुसरीकडे एकेका संचिकेचा प्रवास वर्ष-वर्ष संपत नसल्याचे दिसून येत आहे. असाच अनुभव जिल्हा परिषदेतंर्गतच्या २ हजार ११५ शिक्षकांच्या स्थायित्वाच्या लाभाच्या संचिकेबाबत येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केली आहे. अशा कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे, म्हणजेच त्यांना स्थायित्वाचा लाभ द्यावा, या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने २६ जानेवारी २०१३ रोजी प्रशासनाला दिले होते. त्यानंतर याबाबतीत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र ही संचिका त्रुटींच्या फेऱ्यात सापडली. तत्कालीन सीईओ एस.एल. हरिदास यांनी ‘ओटूएस’ ही प्रणालीही सुरु केली होती. परंतु या प्रणालीद्वारेही संचिकेला फारशी गती मिळाली नाही. त्यामुळे वर्षभरानंतरही या संचिकेचा प्रवास सुरुच आहे.एकीकडे शासन गतिमान प्रशासन हा उपक्रम राबवत आहे. यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे दोन हजारांवर गुरुजींच्या स्थायित्वाची संचिका वर्ष-वर्ष निकाली निघत नाही. मग याला गतिमान प्रशासन म्हणायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही ही संचिका निकाली निघत नसल्याचे लक्षात आल्यानंतर समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य कल्याण बेताळे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धिरज पाटील यांच्याकडे याबाबतीत २१ आॅक्टोबर रोजी निवेदन दिले आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता अध्यक्ष किती गांभिर्याने घेतात याकडे दोन हजारांवर गुरुजींचे लक्ष लागले आहे.