शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जमावाच्या मारहाणीत दोन चोरट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:58 IST

तालुक्यातील पानव-चांडगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि.८) पहाटे ५ वाजेदरम्यान आठ संशयित चोरांची टोळी पकडून त्यांना बेदम मारहाण केल्याने यातील दोघांचा उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाला, तर इतर ६ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालय व वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : तालुक्यातील पानव-चांडगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि.८) पहाटे ५ वाजेदरम्यान आठ संशयित चोरांची टोळी पकडून त्यांना बेदम मारहाण केल्याने यातील दोघांचा उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाला, तर इतर ६ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालय व वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जवळपास ५० ते ६० गावांतील नागरिक रात्रभर गावात खडा पहारा देत आहेत. शुक्रवारी पहाटे ५ ते ६ वाजेदरम्यान पानव-चांडगाव येथील रेल्वे पटरीजवळ ग्रामस्थांनी आठ संशयित चोरट्यांना पाठलाग करून पकडले व त्यांना गावात आणून बेदम चोप दिला.यात सर्व जण गंभीर जखमी झाले. यातील चार जणांना वैजापूर पोलिसांनी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविले असता उपचारादरम्यान भारत सोनवणे (२८, मिटमिटा, औरंगाबाद) व शिवाजी शिंदे (४५, मुकुंदवाडी, औरंगाबाद) या दोघांचा मृत्यू झाला.दगडू काळे (२६, राजापूर, बीड) व रमेश भाऊराव पवार (२८, अनंतवाडी गेवराई, बीड) यांना घाटीच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. इतर जखमी गणेश सोनवणे (२६, शिऊर, वैजापूर), गंगाराम रामदास भोसले (२२, बग्गेवाडी, बीड), राजेश मुन्ना भोसले (२५, राजापूर, बीड) व गमतीदास व्यंकटी काळे (५०, मुकुंदवाडी, औरंगाबाद) या चार जणांवर वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वैजापूर पोलिसांनी जखमींचे जबाब घेतले आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणाविरुद्धही गुन्हा दाखल झालेला नाही.संशयित चोरांचे पुरावे खोटेवैजापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आठ संशयित चोरांचे उपजिल्हा रुग्णालयात जबाब घेऊन तपासचक्र फिरवले.मात्र, संशयित चोरांनी पोलिसांना सांगितलेले नाव व पत्ता केवळ तीन जणांचे खरे असल्याचे समोर आले आहे, तर पाच जणांनी चुकीचे नाव व पत्ता दिला.ग्रामस्थांनी पोलिसांचेमोबाईल हिसकावलेचांडगाव येथे पोलिसांचे पथक पोहोचले, त्यावेळी जवळपास दीड ते दोन हजार ग्रामस्थांचा जमाव जमलेला होता. यावेळी पोलीस मोबाईलमध्ये शूटिंग करून आपल्यावर गुन्हे दाखल करतील, या धास्तीने ग्रामस्थांनी पोलिसांचे मोबाईल हिसकावून घेतले. पोलिसांनीही शांत राहून संशयित चोरांना ताब्यात घेऊन गाडीत बसविले त्यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांचे मोबाईल परत केले.पोलिसांनी केली जमावाच्या तावडीतून चोरांची सुटकागेल्या महिन्यापासून तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने दहशत पसरली आहे. चोरांच्या भीतीने गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. रात्री जागरण करून चोरांना रंगेहाथ पकडण्यासाठी गावकरी त्यांच्या मागावर थांबत आहेत. शुक्रवारी सकाळी चोरटे आल्याची माहिती मिळताच चांडगाव, नांदगाव व परिसरातील दीड ते दोन हजार गावकºयांचा जमाव त्याठिकाणी आला व त्यांनी आठ जणांना बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि. रामहरी जाधव व अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व चोरांना संतप्त जमावाच्या तावडीतून सोडविले. जखमींना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी झालेल्या चौघांना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. पोलीस रवीकुमार कीर्तीकर, भारत पाटील, प्रवीण अभंग, गणेश पाटील व आय बाईक पथकातील गोपाळ जानवाल यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन जखमींचे जबाब नोंदवले. दरम्यान, याप्रकरणी सपोनि. रामहरी जाधव यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरांच्या धास्तीने ७ दिवसात १३ हजार ‘टॉर्च’ची विक्री४वैजापूर तालुक्यात भीतीचे वातावरण वाढत असून चोरावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी बाजारात ‘टॉर्च’ला मागणी वाढत आहे.आश्चर्य म्हणजे चोरांच्या धास्तीने तालुक्यात ७ दिवसात तब्बल १३ हजार ‘टॉर्च’ विक्री झाल्याची विक्रमी नोंद प्रथमच तालुक्यात झाल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स दुकान मालकांनी दिली. ग्रामीण भागात रात्रीचे ९ वाजून गेले की प्रत्येक नागरिकांच्या हातात काठ्या, टॉर्च आणि लोखंडी सळया असतात.४काहींच्या हातात धारदार शस्त्रेही असतात. जागोजागी ८ ते १० माणसांचा जथ्था आवाज करत शोधक नजरेने सर्वत्र फिरू लागतो. रस्त्यातल्या प्रत्येकाकडे संशयाने बघू लागतो. कधीतरी दुरून आवाज येतो. शेजारच्या वस्तीत चोर शिरल्याची आवई उठते, की जथ्था बेभान होऊन त्या दिशेने धावत सुटतो.

टॅग्स :Policeपोलिस