शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: April 1, 2015 01:00 IST

येणेगूर / अचलेर : शाळा सुटल्यानंतर शेतात कामाला गेलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.

येणेगूर / अचलेर : शाळा सुटल्यानंतर शेतात कामाला गेलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी अचलेर (ता.लोहारा) शिवारात घडली.घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील सलगरा (मड्डी) येथील अरुण तानाजी जाधव (वय ११) व बळीराम सुरेश राठोड (वय ११) हे दोन्ही मुले गावातीलच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात़ अरूण जाधव व बळीराम राठोड हे दोघे मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आले होते़ आई-वडिल गावाजवळ असलेल्या अचलेर शिवारात मजुरीने कामाला गेल्याचे समजल्यानंतर ते दोघे त्यांना भेटण्यासाठी शेताकडे निघाले होते़ हे दोघे अचलेर शिवारातील भीमराव ठेंगील यांच्या शेताजवळ आले असता तहान लागल्याने शेततळ्यात पाणी आणण्यासाठी ते उतरले़ प्रारंभी हातातील बाटली भरून बाहेर काढून ठेवल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी पुन्हा शेततळ्यात उतरले होते़ मात्र, त्यावेळी त्यांचा पाय घसरल्याने तळ्यातील पाण्यात पडल्याने बुडून दोघांचा मृत्यू झाला़ दरम्यान, या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून मुरूम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व विलास राठोड करीत आहेत़ या घटनेने सलगरा मड्डी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)