बीड : येथील जिल्हा रूग्णालयात ग्रामीण भागातील रूग्णांचा मोठ्या प्रमाणात भार आहे. असे असतानाही येथील रक्तपेढीत एकूण तीन प्लेट लेटस् च्या मशिन असून यापैकी एक मशिन लातूर येथे दुरूस्तीला पाठविली असल्याने केवळ दोनच मशिनवर येथील रूग्णांचा भार आहे. रूग्णांच्या रक्तातील पेशींचे विघटन करण्याची प्रक्रीया करणाऱ्या तीन मशिन जिल्हा रुग्णालयाकडे आहेत. यातील एक मशिन अनेक महिन्यापासून नादुरूस्त असल्याने दुरूस्तीसाठी लातूरला पाठविली आहे. दिवसाकाठी साडेचारशे ते पाचशे रूग्ण उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात येतात. अनेक रुग्णांना प्लेट लेटस् ची आवश्यकता असते. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व रक्त पेढीत मनुष्य बळ व यंत्र ना दुरूस्तीचा प्रश्न असल्याने जिल्हा रुग्णालयातील रक्त पेढीतील तीन चार कर्मचाऱ्यांना दोन दिवसाआड २४ तास काम करावे लागत आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उन्हाळ्यात कमी पडू दिला नाही रक्त पुरवठा दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदान शिबीरे कमी होत असतात. परिणामी रक्त पुरवठाही कमी होतो. यंदा मात्र याहून वेगळी परिस्थिती होती. ब्लड कार्डवर मोफत रक्त देण्याच्या योजनेमुळे उन्हाळ्यातही रक्ताचा तुटवडा जाणवला नाही. जिल्हा रुग्णालयातील रक्त पेढी विभागात मनुष्य बळाचा अभाव असताना देखील कार्यरत असलेले कर्मचारी वेळेपेक्षा जास्त तास काम करत आहेत. (प्रतिनिधी) मागील दीड दोन वर्षापासून येथील डॉ. जयश्री बांगर यांच्याकडे जिल्हा रुग्णालयातील रक्त पेढीची जबाबदारी आहे. मात्र मागील अनेक महिन्यापासून रक्त पिढी प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या व्यक्ती रजेवर आहेत. शिवाय लॅब इनचार्ज देखील रजेवर असल्याने सर्व भार केवळ डॉ. जयश्री बांगर व त्यांच्या कर्मचाऱ्यावरच असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन प्लेटलेटस् वरच मदार
By admin | Updated: June 9, 2015 00:18 IST