शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

दोनच ग्रा.प.मध्ये पायका योजना

By admin | Updated: June 25, 2014 01:28 IST

अशोक कारके , औरंगाबाद केंद्र शासनाच्या पायका क्रीडा योजनेचा जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींनी दोन वर्षांत दीड कोटी रुपये उचलले; परंतु केवळ २ ग्रामपंचायतींनी या निधीचा योग्य वापर केला आहे.

अशोक कारके , औरंगाबादकेंद्र शासनाच्या पायका क्रीडा योजनेचा जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींनी दोन वर्षांत दीड कोटी रुपये उचलले; परंतु केवळ २ ग्रामपंचायतींनी या निधीचा योग्य वापर केला आहे.ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना मिळावी व त्यातून उत्तम खेळाडू तयार व्हावेत यासाठी केंद्रीय पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायका) ही योजना २००८-२००९ पासून राबविण्यात येत आहे. २००८-९ मध्ये ८४, तर २००९- १० मध्ये ७३ ग्रामपंचायतींना पायकांतर्गत मैदान तयार करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये निधी दिला गेला. यापैकी ८४ पैकी फक्त दोनच ग्रामपंचायतींनी काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून योजनेच्या आढावा बैठकीत गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानाचे काम पूर्ण झाले आहे, काम पूर्णत्वाचा दाखला देतो, असे गेल्या अनेक बैठकांमध्ये सांगत आहेत व जिल्हा क्रीडा विभागातील अधिकारी तलाठी व ग्रामसेवकाकडे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करा, अशी मागणी करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.२००८-९ व २००९-१० आर्थिक वर्षात १५७ ग्रामपंचायतींना मैदान तयार करण्यासाठी १ कोटी ५७ लाख रुपये केंद्र व राज्य शासनाने दिले. प्रत्येक ग्रामपंचायतीला दहा हजार रुपयांचे क्रीडा साहित्यही दिले. यासाठी १५ लाख ७० हजार रुपये खर्च झाला.गेल्या पाच वर्षांत १५७ ग्रामपंचायतींपैकी २००८-९ मध्ये सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव व केऱ्हाळा या ग्रामपंचायतींनी मैदानाचे काम पूर्ण केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिली आहे.२००९-१० मध्ये मात्र पैसे मिळालेल्या ७३ पैकी एकही ग्रामपंचायत काम पूर्ण करू शकली नाही.योजनेत केंद्राचा ७५ टक्के व राज्य शासनाचा २५ टक्के वाटा आहे.योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून आॅलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील, असा हेतू आहे. हॉलीबॉल, फुटबॉल, गोळा, थाळीफेक आदी साहित्य ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आले आहे.निधी परत जाणारलवकरच ग्रामपंयायतींनी काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यास मैदान तयार करण्यासाठी दिलेला निधी परत करण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतींना दिले जातील.-चंद्रकांत कांबळे,उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा५० टक्के काम अपूर्णगटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी व ग्रामसेवकांच्या बैठका घेतल्या आहेत. ५० टक्के ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले आहे. जुलैअखेरपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे काम पूर्ण होईल. काही ग्रामपंचायतींचा जागेचा प्रश्न होता. तो सुटला आहे.-ऊर्मिला मोराळे,जिल्हा क्रीडा अधिकारीग्रामपंचायतीजिल्ह्यातील एकूणग्रामपंचायती- ८५९२००८-२००९ व २००९-२०१० या वर्षी पायकाचा लाभ मिळालेल्या ग्रामपंचायती- १५७गेल्या पाच वर्षांत काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेल्या ग्रामपंचायती- २