शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

दोनच ग्रा.प.मध्ये पायका योजना

By admin | Updated: June 25, 2014 01:28 IST

अशोक कारके , औरंगाबाद केंद्र शासनाच्या पायका क्रीडा योजनेचा जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींनी दोन वर्षांत दीड कोटी रुपये उचलले; परंतु केवळ २ ग्रामपंचायतींनी या निधीचा योग्य वापर केला आहे.

अशोक कारके , औरंगाबादकेंद्र शासनाच्या पायका क्रीडा योजनेचा जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींनी दोन वर्षांत दीड कोटी रुपये उचलले; परंतु केवळ २ ग्रामपंचायतींनी या निधीचा योग्य वापर केला आहे.ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना मिळावी व त्यातून उत्तम खेळाडू तयार व्हावेत यासाठी केंद्रीय पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायका) ही योजना २००८-२००९ पासून राबविण्यात येत आहे. २००८-९ मध्ये ८४, तर २००९- १० मध्ये ७३ ग्रामपंचायतींना पायकांतर्गत मैदान तयार करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये निधी दिला गेला. यापैकी ८४ पैकी फक्त दोनच ग्रामपंचायतींनी काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून योजनेच्या आढावा बैठकीत गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानाचे काम पूर्ण झाले आहे, काम पूर्णत्वाचा दाखला देतो, असे गेल्या अनेक बैठकांमध्ये सांगत आहेत व जिल्हा क्रीडा विभागातील अधिकारी तलाठी व ग्रामसेवकाकडे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करा, अशी मागणी करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.२००८-९ व २००९-१० आर्थिक वर्षात १५७ ग्रामपंचायतींना मैदान तयार करण्यासाठी १ कोटी ५७ लाख रुपये केंद्र व राज्य शासनाने दिले. प्रत्येक ग्रामपंचायतीला दहा हजार रुपयांचे क्रीडा साहित्यही दिले. यासाठी १५ लाख ७० हजार रुपये खर्च झाला.गेल्या पाच वर्षांत १५७ ग्रामपंचायतींपैकी २००८-९ मध्ये सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव व केऱ्हाळा या ग्रामपंचायतींनी मैदानाचे काम पूर्ण केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिली आहे.२००९-१० मध्ये मात्र पैसे मिळालेल्या ७३ पैकी एकही ग्रामपंचायत काम पूर्ण करू शकली नाही.योजनेत केंद्राचा ७५ टक्के व राज्य शासनाचा २५ टक्के वाटा आहे.योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून आॅलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील, असा हेतू आहे. हॉलीबॉल, फुटबॉल, गोळा, थाळीफेक आदी साहित्य ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आले आहे.निधी परत जाणारलवकरच ग्रामपंयायतींनी काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यास मैदान तयार करण्यासाठी दिलेला निधी परत करण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतींना दिले जातील.-चंद्रकांत कांबळे,उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा५० टक्के काम अपूर्णगटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी व ग्रामसेवकांच्या बैठका घेतल्या आहेत. ५० टक्के ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले आहे. जुलैअखेरपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे काम पूर्ण होईल. काही ग्रामपंचायतींचा जागेचा प्रश्न होता. तो सुटला आहे.-ऊर्मिला मोराळे,जिल्हा क्रीडा अधिकारीग्रामपंचायतीजिल्ह्यातील एकूणग्रामपंचायती- ८५९२००८-२००९ व २००९-२०१० या वर्षी पायकाचा लाभ मिळालेल्या ग्रामपंचायती- १५७गेल्या पाच वर्षांत काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेल्या ग्रामपंचायती- २