शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

दोन दिवसीय धान्य महोत्सव

By admin | Updated: May 11, 2014 00:38 IST

हिंगोली : कृषी व पणन विभाग आणि आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे १३ व १४ मे रोजी धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

 हिंगोली : महाराष्टÑ शासनाच्या कृषी व पणन विभाग आणि आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे १३ व १४ मे रोजी धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली येथील महावीर भवनात हा महोत्सव आयोजित केला असून, उत्पादक ते ग्राहक असा थेट संबंध निर्माण करण्याच्या हेतूने या महोत्सवाचा उपक्रम हाती घेण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात विविध प्रकारचे धान्य व फळे तयार होतात. पारंपरिक पद्धतीने होणार्‍या शेतीमाल विक्रीत दलालांची मोठी साखळी कार्यरत असते. त्यामुळे या व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी शेतकरी, उत्पादक आणि ग्राहक यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण होण्याच्या हेतूने सदर धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात अनेक प्रकारचे धान्यांचे जसे गहू, हरभरा, तूर, उडीद, मूग, जवस, कारले इत्यादी मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. त्यामध्ये विविध प्रकाराच्या वाणांची लागवड होते. याशिवाय हरभरा, तूर, उडीद, मूग यांच्या डाळीही शेतकरी गटाद्वारे उत्पादित केल्या जातात. तसेच कृषी मालाचे मूल्यवर्धित पदार्थ जसे हळद पावडर, मसाले, पापड, लोंची इत्यादी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादित करण्यात येत आहेत. या सर्व घटकांना शहरी ग्राहकांशी थेट संपर्क करण्याची संधी यानिमित्ताने शेतकरी उत्पादकाला मिळणार आहे. या धान्य व फळे महोत्सवात भाग घेऊ इच्छिणार्‍या शेतकरी गटाने आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करणे आवश्यक आहे. महोत्सवास ग्राहकांनीही भेट देऊन तसेच धान्याची खरेदी करून उत्पादकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हिंगोली येथे होणार्‍या महोत्सवात नागरिकांनी भेट देवून शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. पवार, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक पी.के. उगले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)