शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

दोन दिवसीय धान्य महोत्सव

By admin | Updated: May 11, 2014 00:38 IST

हिंगोली : कृषी व पणन विभाग आणि आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे १३ व १४ मे रोजी धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

 हिंगोली : महाराष्टÑ शासनाच्या कृषी व पणन विभाग आणि आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे १३ व १४ मे रोजी धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली येथील महावीर भवनात हा महोत्सव आयोजित केला असून, उत्पादक ते ग्राहक असा थेट संबंध निर्माण करण्याच्या हेतूने या महोत्सवाचा उपक्रम हाती घेण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात विविध प्रकारचे धान्य व फळे तयार होतात. पारंपरिक पद्धतीने होणार्‍या शेतीमाल विक्रीत दलालांची मोठी साखळी कार्यरत असते. त्यामुळे या व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी शेतकरी, उत्पादक आणि ग्राहक यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण होण्याच्या हेतूने सदर धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात अनेक प्रकारचे धान्यांचे जसे गहू, हरभरा, तूर, उडीद, मूग, जवस, कारले इत्यादी मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. त्यामध्ये विविध प्रकाराच्या वाणांची लागवड होते. याशिवाय हरभरा, तूर, उडीद, मूग यांच्या डाळीही शेतकरी गटाद्वारे उत्पादित केल्या जातात. तसेच कृषी मालाचे मूल्यवर्धित पदार्थ जसे हळद पावडर, मसाले, पापड, लोंची इत्यादी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादित करण्यात येत आहेत. या सर्व घटकांना शहरी ग्राहकांशी थेट संपर्क करण्याची संधी यानिमित्ताने शेतकरी उत्पादकाला मिळणार आहे. या धान्य व फळे महोत्सवात भाग घेऊ इच्छिणार्‍या शेतकरी गटाने आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करणे आवश्यक आहे. महोत्सवास ग्राहकांनीही भेट देऊन तसेच धान्याची खरेदी करून उत्पादकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हिंगोली येथे होणार्‍या महोत्सवात नागरिकांनी भेट देवून शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. पवार, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक पी.के. उगले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)