शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सत्तावीस हजार ग्राहकांची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:04 IST

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत बिल न भरलेल्या २७ हजार ९८ औद्योगिक ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत बिल न भरलेल्या २७ हजार ९८ औद्योगिक ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १६२ कोटी ७४ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. तथापि, या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली असून, या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे.सातत्याने मागणी केल्यानंतरही वीज बिल न भरणा-या महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि जळगाव परिक्षेत्रातील तब्बल २७ हजार ९८ औद्योगिक ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अशा ग्राहकांसाठी महावितरणने १ जून ते ३१ आॅगस्ट या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे.ज्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात जूनमध्ये वीज बिलाची मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना १०० टक्के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. यानंतर १ जुलै ते ३१ आॅगस्टदरम्यान ज्या ग्राहकांनी वीज बिलाच्या थकबाकीची मूळ रक्कम व व्याजाची २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे, अशा ग्राहकांना ७५ टक्के व्याज व शंभर टक्के विलंब आकाराची रक्कम माफ केली जाणार आहे.१२ वर्षांपेक्षा जास्त काळ न्यायालयीन प्रकरणे असतील व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल, तर संबंधित ग्राहकांनी डिक्रीची रक्कम एकाच वेळी पूर्ण भरल्यास त्या ग्राहकाला १०० टक्के व्याजाची रक्कम माफ केली जाणार आहे.याशिवाय जे १२ वर्षांपर्यंतची न्यायालयीन प्रकरणे असतील व त्यांना न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली आहे, अशा ग्राहकांनी एकाच टप्प्यात डिक्रीची रक्कम भरल्यास त्यांना ५० टक्के व्याजमाफीची सूट मिळणार आहे.या सर्व प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च संबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीज जोडणी देण्यात येईल.या योजनेत १ जूनपासून ग्राहकांना सहभागी होता येईल, असे प्रादेशिक कार्यालयाने कळविले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल