शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अर्धवेळ शाळा निर्णयाच्या श्रेयासाठी शिक्षक संघटनांची चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 18:34 IST

श्रेयवादाने झपाटलेल्या शिक्षक संघटनांनी प्रशासनाला वेठीस धरून शुक्रवारी यासंबंधीच्या निर्णयाची प्रत हस्तगत केली

औरंगाबाद : सध्या जिल्हाभरातील भीषण पाणीटंचाई व उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता शिक्षण सभापती मीना शेळके यांनी अर्धवेळ शाळेच्या प्रस्तावावर गुरुवारी रात्री उशिरा स्वाक्षरी केली. यासंबंधीचे वृत्त शुक्रवारच्या अंकात सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले; परंतु श्रेयवादाने झपाटलेल्या शिक्षक संघटनांनी प्रशासनाला वेठीस धरून शुक्रवारी यासंबंधीच्या निर्णयाची प्रत हस्तगत करीत, आमच्यामुळेच प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचा ‘सोशल मीडियावर’ डंका वाजविला. 

१ मार्चपासून अर्धवेळ शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी शिक्षक समितीने सर्वप्रथम केली होती. शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी एकमताने शिक्षक समितीचा हा प्रस्ताव फेटाळत दरवर्षीप्रमाणे १६ मार्चपासून अर्धवेळ शाळा        भरल्या  जातील, असा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसांनी शिक्षक सेनेने याच आशयाचे निवेदन प्रशासनाला दिले, तर दोन दिवसांपूर्वी गुरुवारी आदर्श शिक्षक समितीने सभापतींकडे अर्धवेळ शाळेची मागणी लावून धरली व निवेदन सादर केले. त्यानंतर रात्री उशिरा सभापती मीना शेळके यांनी २ मार्चपासून याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी सभापतींकडून हा प्रस्ताव शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांना प्राप्त झाला. सायंकाळी यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी स्वाक्षरी केली. दरम्यान, शनिवारी अर्धवेळ शाळा असते. ३ व ४ मार्च रोजी शासकीय सुटी आहे. त्यामुळे ५ मार्चपासून हा आदेश शिक्षण विभागाने शुक्रवारी सायंकाळी जारी केला. तथापि, दुसऱ्या संघटनेला श्रेय जाऊ नये म्हणून दोन-तीन शिक्षक संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली. शाळा सुटताच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा परिषद मुख्यालय गाठून अर्धवेळ शाळेचा निर्णय परस्पर कसा काय घेतला, याबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. 

शिक्षण क्षेत्रातील काही जाणकारांनी मात्र, शिक्षक संघटनांच्या या श्रेयवादाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. शिक्षक संघटनांनी गुणवत्ता वाढविण्यासाठी आपसात स्पर्धा केल्यास बंद होत चाललेल्या जि.प. शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक