शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आठ दिवसांतच एलईडी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:32 IST

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविले. मात्र, अनेक एलईडी लाईट ...

ठळक मुद्देरेल्वेस्टेशन : ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविले. मात्र, अनेक एलईडी लाईट अवघ्या आठ ते दहा दिवसांतच बंद पडल्याची ओरड रेल्वे कर्मचाऱ्यांकडून होत आहे.पर्यावरणपूरक उपाय आणि विजेची बचत करण्यासाठी मार्च २०१८ पर्यंत देशातील सगळ्याच रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनातर्फे ऊर्जा बचतीसाठी एलईडी लाईटच्या वापराला प्रोत्साहन दिले गेले. देशभरात परवडणाºया दरात एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात आले. त्यातून विजेची बचत करण्याचे लक्ष्य साध्य केले जात आहे.रेल्वेनेसुद्धा ऊर्जा बचतीसाठी एलईडी लाईट लावण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद रेल्वेस्टेशनही एलईडी दिव्यांनी प्रकाशित करण्यावर भर दिला गेला. गरजेनुसार सर्वच फलाटांवर एलईडीच्या ट्यूब लावण्यात आल्या. एलईडी ट्यूब लावल्यानंतरही अनेक जागा मोकळ्या राहिल्याने पुरेसा उजेड पडत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फेब्रुवारीत पुन्हा जवळपास ३०० एलईडी ट्यूब बसविण्यात आल्या. औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन एलईडी ट्यूबच्या प्रकाशाने उजळत आहे. मात्र, लावलेले लाईट बंद पडत आहेत. त्यामुळे लाईटच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.पाच वर्षांपर्यंत सुरक्षितफेब्रुवारीत एलईडी ट्यूब बसविण्यात आल्या असून, त्या बंद पडल्यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. सर्व लाईट सुरू आहेत. पाच वर्षांपर्यंत या लाईटला काहीही होत नाही, असे रेल्वेच्या विद्युत अभियंत्यांनी सांगितले.----------

टॅग्स :Aurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनelectricityवीज