शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या भडक्याला आणखी हवा; नवीन तूर येऊनही डाळ कडाडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 19:49 IST

तुरीच्या कमी उत्पादनामुळे भाववाढीच्या भडक्याला आणखी हवा मिळाली आहे. 

ठळक मुद्देग्राहकांना बसत आहे फटका क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढअपेक्षित उत्पादन नसल्याचा परिणाम

औरंगाबाद : नवीन तूर बाजारात येताच डाळींचे भाव कमी होतात, असा दरवर्षीचा अनुभव; मात्र यंदा नवीन तुरीची आवक सुरू झाली असतानाही डाळींचे भाव मात्र कडाडले आहेत. मागील आठवड्यात ५०० रुपयांनी भाववाढ होऊन तूर डाळ ६६०० रुपये क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचली आहे. तुरीच्या कमी उत्पादनामुळे भाववाढीच्या भडक्याला आणखी हवा मिळाली आहे. 

दुष्काळी भागात प्रामुख्याने खरिपात तूर पीक घेण्याकडे मागील काही वर्षांत शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात ४० हजार ५८७ हेक्टरवर तुरीची लागवड होते; मात्र यंदा अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांनी तूर लागवडीत हात आखडता घेतला. परिणामी, ३० हजार ८८३ हेक्टरवरच तुरीची लागवड झाल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. परतीचा पाऊस पडलाच नसल्याने तूर पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. ६० ते ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटल्याचे सांगितले जात आहे. 

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन तुरीची तुरळक आवक सुरू झाली आहे. बुधवारी ३० पोती तूर विक्रीसाठी आली. ५००० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल दराने नवीन तूर खरेदी केली जात आहे. राज्य शासनाने हमीभाव ५५०० रुपये घोषित केला आहे. अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, तुरीचे उत्पादन ६० ते ७० टक्के कमी आहे. सध्या तुरळक आवक सुरू झाली असून, यंदा उत्पादनातील घट लक्षात घेता पुढील महिनाभर हंगाम सुरू राहील, असे वाटते. डाळीच्या एका व्यापाऱ्याने सांगितले की, नवीन तुरीचे उत्पादन कमी असल्याने मिलवाल्यांनी डाळींचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे.

मागील आठ दिवसांत तूर डाळ क्विंटलमागे ५०० रुपयांनी वधारली. आज ६२०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल तूर डाळ विकत आहे. २०१५ यावर्षी तूर डाळ १८० ते २२० रुपये किलोपर्यंत उच्चांकी भावात विकली होती. सध्या किरकोळ विक्रीत ७५ रुपये किलोपर्यंत डाळ विकत आहे. 

शेतकऱ्यांना तुरीचा हमीभाव मिळेना सरकारने नवीन तुरीला ५६७५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला आहे. यंदा दुष्काळामुळे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले असतानाही बाजारात तुरीला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळणे अपेक्षित होते. बाजारात शेतकऱ्यांकडून  तूर ५२०० ते ५३०० रुपये प्रतिक्विंटलच खरेदी केली जात आहे. म्हणजे क्विंटलमागे अजूनही ३७५ ते ४७५ रुपये कमी भाव दिला जात आहे. यासंदर्भात अडत व्यापारी कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, एफएक्यू गुणवत्तेची तूर मिळाली तरच सरकार हमीभाव देते; मात्र यंदा पाणी कमी पडल्याने तुरीची गुणवत्ता घसरली आहे. दाणे बारीक पडले आहेत. हिरवट दाण्याचे प्रमाण अधिक आहे, तसेच मुकनीचे प्रमाण अधिक असल्याने तुरीला हमीभाव देणे परवडत नाही, अशी तूर सरकारही खरेदी करणार नाही. 

सरकारी तिजोरीला फटका दुसरीकडे मागील वर्षी सरकारने ५२५० रुपये प्रतिक्विंटलने तूर खरेदी केली होती. तीच तूर सरकारने डाळ मिलवाल्यांना व बड्या व्यापाऱ्यांना ३५०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलने विकली. यात सरकारला क्विंटलमागे १५५० ते १७५० रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला. याच जुन्या तुरीची डाळ करून मिलवाले आज ४५०० ते ४७०० रुपये क्विंटल विकत आहेत. 

चार महिन्यांत डाळींच्या दरात झालेली वाढडाळ             आॅगस्ट २०१८    नोव्हेंबर २०१८तूर डाळ        ५१०० ते ५३०० रु.    ६२०० ते ६६०० रु.उडीद डाळ    ३७०० ते ४००० रु.    ५८०० ते ६५०० रु.हरभरा डाळ   ४७०० ते ५००० रु.    ५७०० ते ६१०० रु.मूग डाळ        ६००० ते ६३०० रु.    ६८०० ते ७३०० रु.मसूर डाळ      ४५०० ते ४७५० रु.    ५००० ते ५३०० रु.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार