बाळासाहेब जाधव , लातूरशतकोटी वृक्ष लागवडीनंतर आता दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. या अंतर्गत ९ लाख १८ हजार ६८८ वृक्षांची लागवड एकाच दिवशी करण्यात आली. आता संवर्धन करणे गरजेचे आहे. तो प्रयत्न आपण करू, असे सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालक सुवर्णा माने ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या.सुवर्णा माने म्हणाल्या, वनक्षेत्रामध्ये महिलांचे प्रमाण कमी असले तरी वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे शेतीशी निगडीत असलेल्या वनविभागातच भविष्यातील करिअर करण्याचा निर्धार मनाशी बांधून त्या क्षेत्रात काम सुरू केले. २००१ ते २०११ या कालावधीत सहाय्यक वनसंरक्षक याच पदावर कामकाज केल्यामुळे वनविभागातील कामाचे स्वरुप माहीत झाले. वन कायदे, त्याची अंमलबजावणी, वन व्यवस्थापन, वृक्ष लागवड, वनक्षेत्र, जल व मृदसंधारणाची कामे, वन्यजीव व्यवस्थापन याची जवळून माहिती झाली अन् त्या कामाच्या आधारे २०१६ मध्ये लातूर येथील सामाजिक वनीकरण विभागामध्ये उपसंचालकपदी बढती मिळाली. याच कालावधीत शासनाचा दोन कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला असून, त्या वृक्षांच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्नशील राहू. सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आता संवर्धनाचे उद्दिष्ट असल्याचेही त्या म्हणाल्या.
वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करणार
By admin | Updated: July 12, 2016 00:55 IST