शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले

By admin | Updated: September 18, 2016 01:59 IST

औरंगाबाद : मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड बायपास रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.

औरंगाबाद : मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड बायपास रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. परिणामी या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून, शनिवारी दुपारी एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले तर त्यांच्या दोन चिमुकल्या मुली जखमी झाल्या. या भीषण अपघाताचे दृश्य पाहून संतप्त नागरिकांनी पळून जात असलेल्या ट्रकचालकाला चोप दिला आणि ट्रकवर दगडफेक केली.फईम शेख (३५) आणि नसरीन फईम शेख (३०, रा. पारुंडी, ता. पैठण) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेत जरीन शेख (६) आणि फराहन (३) या दोन मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, फईम शेख हे पत्नी आणि दोन मुलींसह मोटारसायकलने पारुंडी येथून औरंगाबादला येत होते. सिग्मा हॉस्पिटल येथे त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचे होते. तर त्यांना उडविणारा ट्रक हा जालना येथून औरंगाबादमार्गे गुजरातला निघाला होता. फईम हे देवळाई चौकातून शहरात येण्यासाठी आपली दुचाकी वळवत असतानाच त्यांच्या मागून वेगात आलेल्या रिकाम्या ट्रकने (क्र. जीजेयू -६७७७) त्यांना जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, फईम हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन मेंदू बाहेर आल्याने ते घटनास्थळीच ठार झाले. त्यांच्या पत्नीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या घटनास्थळी बेशुद्ध पडल्या होत्या. रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरीन आणि फराहन या मुलींना किरकोळ जखमा झाल्या असून, या भीषण अपघातात त्या बालंबाल बचावल्या.ट्रकचालकास चोप आणि ट्रकवर दगडफेकया अपघातानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ट्रकचालकास नागरिकांनी चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी ट्रकचालक राजकुमार राधेश्याम यादव (रा. वापी, गुजरात) यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. यावेळी काही लोकांनी ट्रकवर दगडफेक करून समोरच्या काचा फोडल्या.प्रत्यक्षदर्शी धावले मदतीला...या अपघाताचे भयावह दृश्य पाहून अनेक जण मदतीला धावले. यावेळी फईम यांच्या मेंदूचा चेंदामेंदा झाल्याने ते जागीच गतप्राण झाल्याचे पाहून लोकांनी त्यांच्या प्रेतावर कपडा टाकला. तर गंभीर नसरीन आणि दोन्ही बालिकांना जखमी अवस्थेत उचलून रुग्णालयात पाठविले. देवळाई चौकातील दुकानदार आणि अन्य वाहनचालकांनी प्रथम घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत मोठी गर्दी जमली होती. अपघातानंतर वाहनांधारकांना घाईच....अपघात घडल्यानंतर देवळाई चौकात नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. ट्रकखाली दबलेल्या मृताचे शव आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रत्यक्षदर्शी घाई करीत होते. या परिस्थितीतही काही वाहनचालक सिग्नल तोडून तेथून जाण्यासाठी घाई करीत होते. अत्यंत वर्दळीचा आणि दक्षिणेकडील शहराचे प्रवेशद्वार म्हणून देवळाई चौक ओळखला जातो. बीड बायपासच्या पलीकडे मोठी नागरी वसाहत निर्माण झाल्याने या चौकातून ये- जा करणाऱ्या वाहनचालकांची संख्याही वाढली आहे.नागरिकांनी केली पोलिसांना मदतअपघातामुळे काही काळ वाहने थांबविण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि काही वाहनचालक पुढे जाण्याची घाई करीत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यावेळी चौक परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी स्वत: रस्त्यावर उभे राहून पोलिसांना मदत करून तेथील वाहनांचा मार्ग मोकळा केला. यामुळे वाहतूक सुरळीत झाली.दोन सहायक आयुक्तांसह पाच पोलीस निरीक्षकअपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केल्याचे कळताच वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सी. डी. शेवगण, उस्मानपुरा विभागाच्या सहायक आयुक्त मकवाना यांच्यासह सातारा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे, जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर, मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक अनिल आढे, उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक सुरेश टाक, वाहतूक शाखेचे निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी ट्रकचालक राजकुमार यादव यास अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक भारत काकडे यांनी दिली.