शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बिलोली तालुक्यातील २८ तलावांत ठणठणाट

By admin | Updated: July 23, 2014 00:22 IST

राजेश गंगमवार, बिलोली तालुक्यातील निजामकालीन २८ मालगुजारी तलावांतील जलसाठा समाप्त झाला आहे़ ऐन पावसाळ्यात जनावरांसाठी पाणीप्रश्न निर्माण झाला

राजेश गंगमवार, बिलोलीतालुक्यातील निजामकालीन २८ मालगुजारी तलावांतील जलसाठा समाप्त झाला आहे़ ऐन पावसाळ्यात जनावरांसाठी पाणीप्रश्न निर्माण झाला असून खेड्यापाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ मागच्या दोन महिन्यांत अत्यल्प पाऊस झाल्याने तलावात जलस्तर वाढलाच नाही़तालुक्यात निजामकालीन तलावांची संख्या २८ आहे़ प्रामुख्याने निजामाच्या राजवटीत निर्माण केलेल्या तलावांची देखरेख जवाबदारी सध्या जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाकडे आहे़ बिलोली शहरात दोन तलाव असून त्या पाठोपाठ कुंडलवाडी येथेही दोन मोठे तलाव आहेत़ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग व्हावा असा उद्देश होता़ गाव पातळीवर जनावरांच्या पाण्यासाठी सोय होत होती़ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तलावांचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे गेले़ मागच्या पाच वर्षात लोकसहभाग अंतर्गत तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता़ परिणामी जलस्तर वाढवण्यासाठी मदत झाली़ योगायोगाने गतवर्षी मोठा पाऊस झाला़ मागच्या पावसाळा हंगामात ९७० मि़मी़ पाऊस झाला जो की सरासरी पर्जन्यमानपेक्षा जास्तीचा होता़ पावसाळा जास्त झाल्याने प्रत्येक तलावातील पाणी वाढले़ विशेष म्हणजे, याच वर्षात बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न निकाली लागला, त्यामुळे जमिनीतील जलस्तर उंचावला व तलावाची पाणीपातळी स्थिर राहिली़ तालुक्याला गोदावरी व मांजरा नदीचा वेढा आहे़ त्यामुळे तलावांची पाणीपातळी टिकून राहते़ गतवर्षीच्या अतिवृष्टीसारख्या पावसामुळे उन्हाळ्यातही तलाव भरून राहत आले़ आता मागच्या दीड-दोन महिन्यातील पाणीवापर, अत्यल्प पाऊस त्याचप्रमाणे बाभळीचा तेलंगणातील विसर्ग त्यामुळे जवळपास सर्वच तलाव कोरडेठाक पडले आहेत़ तालुक्यात बिलोली, कुंडलवाडी, अर्जापूर, बडूर, हिंगणी, दर्यापूर, भोसी, आळंदी, सावळी, मिनकी, सगरोळी, आंजनी, बामणी, केरूर, पिंपळगाव अशा २८ तलावांतील पाणीस्थिती गंभीर झाली आह़े़ पावसाळ्यातच जलसाठा वाढतो पण अतिशय कमी पाऊस झाल्याने जलस्तर वाढण्यात आला नाही़ सध्या सर्वच तलाव कोरडेठाक पडले आहेत़ तलावातील भाग आता कोरडवाहू शेतीप्रमाणे दिसत आहे़काही मोठ्या तलावात कुठेतरी पाणी दिसून येते़ तेथे बेधडक मोटार लावून अनधिकृत शेती करण्यात येत आहे़ बिलोलीच्या १०० एकर तलावाचा भाग अतिक्रमणधारकांनी वेढला असून पाटबंधारे विभाग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे़ पावसाळ्यात उन्हाळ्याप्रमाणे स्थिती असून दरवर्षी पाण्याने भरून दिसणारे सर्व तलाव रिकामे दिसत आहेत़