शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

वृक्षलागवड? छे, फक्त प्रसिद्धीसाठी

By admin | Updated: July 5, 2017 00:19 IST

धर्माबाद : रोपटे लावताना फक्त काढण्यापुरता व तो फोटो व्हॉटस्अप, फेसबुकवर पाठवून सोशल मीडियात चमकोगिरी करण्यापुरतेच हे अभियान दिसत

लक्ष्मण तुरेराव । लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये वृक्ष लागवडीस १ जुलैपासून सुरूवात झाली. वृक्ष लागवड करताना लोकप्रतिनिधी, अधिकारी सहभागी झाले. परंतु रोपटे लावताना फक्त काढण्यापुरता व तो फोटो व्हॉटस्अप, फेसबुकवर पाठवून सोशल मीडियात चमकोगिरी करण्यापुरतेच हे अभियान दिसत असून रोपटे लावल्यानंतर त्याच्या संवर्धनाचे काय? असा सवाल आहे. वृक्ष लागवडीनंतर काही दिवसांतच ही रोपटी नष्ट होतात, असा धर्माबाद तालुक्याचा अनुभव आहे. गेल्यावर्षी लावलेली किती झाडे आजघडीला जगली? याचा जर ताळमेळ काढला तर शासनाच्या आदेशाची औपचारीकता पूर्ण करण्यापुरतेच अभियान निव्वळ कागदावर आहे. गतवर्षीही शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड अभियान राबविले.प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयासाठी उद्दिष्टही देण्यात आले. त्यावर लाखो रूपयांचा खर्चही करण्यात आला. परंतु लागवड केल्यानंतर त्या लावलेल्या रोपट्यांचे काय झाले? हे कुणालाच माहीत नाही. केवळ लागवड करून लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी आपले हात झटकले. त्यामुळे संवर्धनाअभावी गतवर्षी लावलेले अनेक रोपटे नष्ट झाल्याचे चित्र तालुक्यात आहे.राज्य सरकारने १ ते ७ जुलैपर्यंत ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यानुसार वृक्षलागवड करण्यात येत आहे. पण अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी, अधिकारी एखादे झाड लावून फोटो काढण्याचा व त्यानंतर तोच फोटो सोशल मीडियात व वर्तमानपत्रात टाकून "चमकोगिरी" करत आहेत. शासनाच्या उद्दिष्टाला केवळ औपचारिकता पूर्ण करून हरताळ फासण्याचे काम लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून होत आहे, अशा स्थितीत मात्र १ ते ७ जुलैपर्यंत लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडांची पाहणी ही प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. दिलेल्या उद्दिष्टांपैकी किती वृक्ष लावण्यात आलेत? वृक्ष योग्यरीत्या लावण्यात आले की नाही? दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता झाली की नाही?, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी व या कामात हलगर्जीपणा व चमकोगिरी करणाऱ्यांवर कार्यवाही करावी. तेव्हाच वृक्षलागवड कार्यक्रम हा यशस्वी होईल; अन्यथा योजनेचा बोजवारा होईल हे मात्र निश्चित़