शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

वृक्ष लागवडीची तपासणी होणार

By admin | Updated: September 5, 2014 00:14 IST

अभिमन्यू कांबळे, परभणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची तपासणी केली जाणार आहे़

अभिमन्यू कांबळे, परभणीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची तपासणी केली जाणार असून, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांना नियुक्त केले जाणार आहे़ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता़ ही वृक्ष लागवड रस्त्याच्या दुतर्फा, गट लागवड, पडिक शेत जमीन लागवड, शाळेच्या किंवा सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या परिसरात करण्यात आली होती़ यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता़ या मोहिमेंतर्गत संबंधित ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण करताना वृक्षसंगोपन या बाबीकडेही लक्ष देणे आवश्यक असते़ यासाठी रोगांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारी काही कुटूंबियांवर सोपविण्यात आली होती़ गेल्या तीन वर्षात वृक्षारोपण करण्यात आल्यानंतर सद्यस्थितीमध्ये किती झाडे जीवंत आहेत याचा आढावा घेण्याचे आदेश राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत़ यासाठी २५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवावी़ यासाठी माध्यमिक शाळांमधील शिक्षक व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि हरित संरक्षण गटांमध्ये समाविष्ठ असलेल्या व्यक्तींकडून या रोपांची तपासणी करावी, असेही या संदर्भातील आदेशात म्हटले आहे़ या मोहिमेत ज्या ठिकाणी रोपे जीवंत नाहीत त्या ठिकाणी पुनर लागवड करण्याच्या दृष्टीकोनातून सुधारात्मक कृती करणे अपेक्षित असल्याचे आदेशात म्हटले आहे़ सहा सदस्यांची समितीया विशेष तपासणी मोहिमेसाठी जि़ प़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची नियुक्त करण्यात आली असून, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक या समितीचे सचिव राहणार आहेत़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामंपचायत) तसेच मग्रारोहयोचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक, रोहयो उपजिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी हे या समितीचे सदस्य राहणार आहेत़ शिक्षक, विद्यार्थ्यांना मानधनया विशेष तपासणी मोहीमेत काम करणाऱ्या शिक्षकांना एका ग्रामपंचायतीच्या एका कामसाठी २०० रुपये, दोन कामांसाठी ३०० रुपये आणि तीन पेक्षा जास्त कामांसाठी ४०० रुपये मानधन दिले जाणार आहे़ तर विद्यार्थ्यांना एका कामासाठी १०० रुपये, दोन कामांसाठी १५० रुपये आणि तीनपेक्षा अधिक कामांसाठी २०० रुपये मानधन दिले जाणार आहे़ परभणीत ८ रोजी होणार बैठकसंपूर्ण राज्यभरात या मोहिमेचे काम सुरू झाले असले तरी परभणी जिल्हा परिषदेत मात्र अद्यापही तपासणीचे काम सुरू नाही़ या संदर्भात जि़ प़ तील पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी करडखेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर ८ सप्टेंबर रोजी संबंधितांची बैठक बोलावली असल्याचे सांगितले़ ८ रोजी बैठक झाल्यानंतर पुढच्या आठ दिवसांमध्ये तपासणी मोहीम होईल का? असा सवाल उपस्थित होत आहे़ कारण या बाबतची तपासणी जिल्ह्यातील ७०४ ग्रा़पं़मध्ये करायची आहे़ विशेष म्हणजे जि़ प़ कडे तीन वर्षात केलेल्या वृक्षारोपणाची माहितीच सध्या उपलब्ध नाही़