शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

वृक्ष संवर्धनाला ‘दुष्काळा’चा फटका!

By admin | Updated: June 5, 2016 00:35 IST

जालना : वृक्ष लागवड योजनेला गतवर्षी दुष्काळाचा फटका बसल्याचे चित्र आहे. अत्यल्प पाऊस व पाणी पुरवठ्याच्या अपुरी सोय यामुळे शेकडो हेक्टरवरील रोपे जळून गेली आहेत.

जालना : वृक्ष लागवड योजनेला गतवर्षी दुष्काळाचा फटका बसल्याचे चित्र आहे. अत्यल्प पाऊस व पाणी पुरवठ्याच्या अपुरी सोय यामुळे शेकडो हेक्टरवरील रोपे जळून गेली आहेत. मात्र, वन विभागाने ७० टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा केला आहे. वन विभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च होत असला तरी त्याची फलश्रुती अपेक्षित होताना दिसून येत नाही. शंभर झाडे लावल्यास १० ते २० रोपे कसबशी तग धरून असतात. गतवर्षी तब्बल १ कोटी २९ लाख रूपये वृक्ष लागवडीसाठी वन विभागाने खर्ची केले. प्रत्यक्षात स्थिती मात्र विदारकच आहे. ४३० हेक्टरवर मोहा, साग, खैर, आंबा आदी आठ ते दहा प्रकारची मिळून ८ लाख ६० हजार रोपे लावण्यात आली आहेत. ही लागवड वनविभागाच्या १९ साईडवर करण्यात आली होती.यंदा ३ लाख ८२ हजार रोपांची लागवड करण्याचा संकल्प आहे. यातील पहिला टप्पा १ जुलै रोजी होणार आहे. या दिवशी १ लाख ५० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी योग्य नियोजन पूर्ण झाल्याचे वन अधिकरी जी.एम.शिंदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यंदा रोपांची लागवड पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन पद्धतीने रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाकडून प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. मोह, खैर, साग, शिवम, आंबा, जांभूळ, सीताफळ आदी झाडांचा समावेश आहे.