शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

राखी पौर्णिमेमुळे ट्रॅव्हलची भाडेवाढ; मुंबईसाठी लागतात ८०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:02 IST

कोरोना महामारीमुळे शहरातील १५० खासगी ट्रॅव्हल बसपैकी केवळ ५० बस चालविल्या जात होत्या. सध्या सुट्टीच्या दिवशी प्रवासीसंख्या अधिक असल्यामुळे ...

कोरोना महामारीमुळे शहरातील १५० खासगी ट्रॅव्हल बसपैकी केवळ ५० बस चालविल्या जात होत्या. सध्या सुट्टीच्या दिवशी प्रवासीसंख्या अधिक असल्यामुळे एखाद-दोन बस वाढविण्यात येत आहेत. बसची देखभाल, वाढलेल्या इंधन खर्चाची तरतूद करताना बसचालकांची मोठी तारेवरची कसरत होत आहे. शासनाने खबरदारी घेत निर्बंध उठवले असले तरी कोरोना अद्याप पूर्ण गेलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी अधिक काळजी घ्यावी, अशा सूचना शासनाकडून वारंवार दिल्या जात आहे.

प्रवासी वाढले असले तरी प्रवासी टिकवून ठेवण्याकरिता भाववाढ केलेली नाही. औरंगाबाद, मुंबई व पुणे, नागपूर जाणाऱ्या गाड्या जेमतेम सुरू आहेत. राखी पौर्णिमा सण असला तरी कोरोनाच्या दहशतीमुळे थोडेफार प्रवासी बाहेर येत आहेत. बसने जाण्यापेक्षा प्रवासी खासगी कारने प्रवास करीत आहेत. कारण बसमध्ये कोरोनाची बाधा होण्याची भीतीही वाटत आहे. असे प्रवाशांचे मत झाले आहे. परंतु एकट्याने प्रवास करायचा झाल्यास बस किंवा खासगी ट्रॅव्हल बसशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी प्रवाशाला आठशे रुपयेपर्यंत प्रवासभाडे मोजावे लागत आहे.

डिझेल वाढीमुळे भाडेवाढीची शक्यता...

डिझेलचे भाव वाढल्यामुळे खासगी बसचालकांना आर्थिक फटका बसत आहे. प्रवाशांना टाळता येत नाही, ते टिकवण्यासाठी भाववाढ केलेली नाही. अजून बहुतांश ट्रॅव्हलची ऑफिसेस बंद आहेत. पुढील महिन्यात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झाला नाही तर कार्यालये सुरू होतील. सध्या ५० ट्रॅव्हल बस चालविल्या जात आहेत. मुंबई, नागपूर, पुणे जाणाऱ्या गाड्यांना थोडेफार प्रवासी मिळतात. आता तर नाही; पण पुढील महिन्यापासून भाववाढीचा विचार होऊ शकतो. प्रवाशांना परवडेल असे भाडे आहे. कोरोना नियमांचे पालन करून सध्याची खासगी बस नियमितपणे सुरू आहे. सणामुळे फरक पडलेला दिसत नाही. - राजन हौजवाला