शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

कचराकोंडी फुटणार पुढच्या वर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:31 IST

शहरातील कचराप्रश्नी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. शहरातील कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याची कबुली सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देऔरंगाबाद मनपा आयुक्त : कालबद्ध कार्यक्रम राबविण्यास वेळ लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचराप्रश्नी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. शहरातील कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याची कबुली सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रानुसार मागील ९० दिवसांमध्ये महापालिकेला काहीच काम करता आले नाही. याबद्दल पुन्हा एकदा न्यायालयाची दिलगिरी व्यक्त करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.शहरातील कचरा उचलणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एकच निविदा काढण्यात येत आहे. कचरा उचलणे म्हणजे चौकाचौकातील कचरा उचलणे नव्हे, तर डोअर टू डोअर कलेक्शनची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. या कामासाठी त्याने सुचविलेल्या दरानुसार पैसे देण्यात येतील. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी कंत्राटदाराला कोणत्या मशीन हव्यात त्या महापालिका खरेदी करून देईल. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मनपा एक रुपयाही देणार नाही. दीडशे मेट्रिक टनचे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. सध्या महापालिका खाजगी रिक्षा, चालक, डिझेल आदींसाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च करीत आहे. यातील एक टप्पाही विस्कळीत झाल्यास शहरात कचºयाची ओरड होते. या सर्व बाबींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत शंभर टक्के प्रक्रिया होईल.शहरात ठिकठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडून असलेल्या कचºयाचे वर्गीकरण करून तो उचलण्यात येईल. यासाठी किमान आठ दिवसांचा वेळ लागेल.या कामासाठी कचरा वेचकांची मदत घेतली जाईल. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डातील कचरा तेथेच जिरावा यादृष्टीनेही प्रयत्न होतील. शासनाने सुचविलेल्या डीपीआरमध्ये काही बदल करायचे असतील तर ते शासनाला सांगून बदल केले जातील.नागरिकांनी विश्वास का ठेवावा?मागील तीन महिन्यांपासून महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी कचरा प्रश्नात निव्वळ घोषणा करीत आहेत. आता तरी नागरिकांनी मनपावर का विश्वास ठेवावा, या प्रश्नावर महापौर, आयुक्त यांनी नमूद केले की, न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रानुसारच काम होत आहे. या कामात विलंब झाला, हे आम्हाला मान्य आहे. रमजाननिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. व्यापाºयांना नोटिसा देण्याचे आदेशही महापौरांनी दिले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादCourtन्यायालय