शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

कचराकोंडी फुटणार पुढच्या वर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:31 IST

शहरातील कचराप्रश्नी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. शहरातील कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याची कबुली सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देऔरंगाबाद मनपा आयुक्त : कालबद्ध कार्यक्रम राबविण्यास वेळ लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचराप्रश्नी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. शहरातील कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याची कबुली सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रानुसार मागील ९० दिवसांमध्ये महापालिकेला काहीच काम करता आले नाही. याबद्दल पुन्हा एकदा न्यायालयाची दिलगिरी व्यक्त करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.शहरातील कचरा उचलणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एकच निविदा काढण्यात येत आहे. कचरा उचलणे म्हणजे चौकाचौकातील कचरा उचलणे नव्हे, तर डोअर टू डोअर कलेक्शनची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. या कामासाठी त्याने सुचविलेल्या दरानुसार पैसे देण्यात येतील. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी कंत्राटदाराला कोणत्या मशीन हव्यात त्या महापालिका खरेदी करून देईल. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मनपा एक रुपयाही देणार नाही. दीडशे मेट्रिक टनचे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. सध्या महापालिका खाजगी रिक्षा, चालक, डिझेल आदींसाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च करीत आहे. यातील एक टप्पाही विस्कळीत झाल्यास शहरात कचºयाची ओरड होते. या सर्व बाबींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत शंभर टक्के प्रक्रिया होईल.शहरात ठिकठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडून असलेल्या कचºयाचे वर्गीकरण करून तो उचलण्यात येईल. यासाठी किमान आठ दिवसांचा वेळ लागेल.या कामासाठी कचरा वेचकांची मदत घेतली जाईल. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डातील कचरा तेथेच जिरावा यादृष्टीनेही प्रयत्न होतील. शासनाने सुचविलेल्या डीपीआरमध्ये काही बदल करायचे असतील तर ते शासनाला सांगून बदल केले जातील.नागरिकांनी विश्वास का ठेवावा?मागील तीन महिन्यांपासून महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी कचरा प्रश्नात निव्वळ घोषणा करीत आहेत. आता तरी नागरिकांनी मनपावर का विश्वास ठेवावा, या प्रश्नावर महापौर, आयुक्त यांनी नमूद केले की, न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रानुसारच काम होत आहे. या कामात विलंब झाला, हे आम्हाला मान्य आहे. रमजाननिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. व्यापाºयांना नोटिसा देण्याचे आदेशही महापौरांनी दिले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादCourtन्यायालय