शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

पाण्याच्या टँकरची वाहतूक पोलिसांकडून होणार दररोज तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:26 IST

पाण्याचे टँकर वाहतूक नियमाप्रमाणे करा, पाणीपुरवठा करता म्हणून कोणतीही सवलत पोलिसांकडून मिळणार नाही, असा सज्जड दम शहर वाहतूक विभागाचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे यांनी दिला.

औरंगाबाद : पाण्याचे टँकर वाहतूक नियमाप्रमाणे करा, पाणीपुरवठा करता म्हणून कोणतीही सवलत पोलिसांकडून मिळणार नाही, असा सज्जड दम शहर वाहतूक विभागाचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे यांनी दिला. एवढेच नव्हे तर पाण्याच्या टँकरची दररोज तपासणी केली जाणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

जयभवानीनगर येथे पाण्याच्या टँकरने नऊ वर्षीय मुलीला चिरडल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. वर्षभरापूर्वी सिडकोत महाविद्यालयीन तरुणीला टँकरचालकाने चिरडल्याची घटना घडली होती. पाण्याचे टँकरचालक हे नियम पायदळी तुडवून वाहतूक करतात, अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वी वाहतूक विभागाकडे आल्या होत्या.

दरम्यान, आजची दुर्दैवी घटना समजताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त काकडे यांनी शहरातील पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरचालक-मालकांची बैठक घेतली.

बैठकीत काकडे म्हणाले की, पाणी वाहतूक करणाºया टँकरचालकाने नियमानुसार वाहन चालवावे. पाणीबाणी परिस्थिती आहे, म्हणून कोणत्याही टॅँकरचालकास पोलिसांकडून सहानुभूती मिळणार नाही. वाहन मर्यादित वेगाने चालवावे, विना लायसन्स वाहन चालवू नये, वाहनांवर नंबर प्लेट चारही बाजूने असावी, वाहनांवर परावर्ती पट्टी लावावी, टँकरचालकासोबत एक मदतनीस ठेवा, दारू पिऊन वाहन चालवू नका, वाहनाची कागदपत्रे सोबत बाळगा, टँकरची गळती रोखावी आदी अशा सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय १३ जूनपासून वाहतूक पोलिसांकडून पाण्याच्या टँकरची दररोज अचानक तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले.

या बैठकीला पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, नाथा जाधव, शरद इंगळे, अशोक मुदीराज आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater transportजलवाहतूक