शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

वाहतुक पोलिसांची ‘हिरोगिरी’ वाहनाधारकांच्या मुळावर

By admin | Updated: June 25, 2014 00:41 IST

हिंगोली : शहरातील वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची ‘हिरोगिरी’ वाहनधारकांच्या मुळावर आल्याचा प्रसंग मंगळवारी शहरातील बडोदा बँकेच्या समोर अकोला रस्त्यावर घडला.

हिंगोली : शहरातील वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची ‘हिरोगिरी’ वाहनधारकांच्या मुळावर आल्याचा प्रसंग मंगळवारी शहरातील बडोदा बँकेच्या समोर अकोला रस्त्यावर घडला. वेळीच कंटनेर तारांच्या खालून निघून गेल्याने दुर्घटनाही टळली. हिंगोली शहराबाहेरून जाणारा बायपास रस्ता दुरूस्त करण्यात आला आहे. तरीही शहरामधून परराज्यात जाणारी जड वाहने जाण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. सहाजिकच वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी याकडे कानाडोळा करून ‘पावती’ फाडण्याचे एक साधनच या वाहनांना बनविले आहे. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास शहरातील अकोला रोडवर बडोदा बँकेच्या समोरील रस्त्यावर वाहतुक शाखेचे ३ पोलिस कर्मचारी ‘पावत्या’ फाडण्याच्या बेताने उभे होते. याच वेळी हिंगोली शहरातून अकोल्याकडे जाणारा एम.एच.२० - एटी १९८९ या क्रमाकांचा कंटनेर शासकीय विश्रामगृहाकडून येत असल्याचे एका पोलिस कर्मचाऱ्यास दिसले. मोठे वाहन आल्याने ‘पावती’ ची सोय झाली, या उद्देशाने या पोलिस कर्मचाऱ्याने या वाहनाला बडोदा बँकेच्या समोर डाव्या बाजूला उभे केले. याच वेळी या बाजूला असलेल्या पोलवरील विजेच्या तारा लोंबकळत होत्या. कंटनेर बाजूला घेत असताना कंटनेरमधील क्लिनरने लाकडाच्या साह्याने या तारा उंचावण्याचा प्रयत्न केला; परंतु या तारा फारशा उंचावत नसल्याचे पाहून हातातील लाकूड बाजूला काढले व कंटनेर पुढे नेऊन उभा केला. या धक्याने तारा जोराने हलल्या व एकमेकांवर आदळल्याने थिणग्या पडल्या व एक तार तुटून जमिनीवर पडली. त्याच वेळी या रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मोटारसायकल चालकांनी मोटारसायकली तशाच टाकून विजेचा धक्का लागेल, या भीतीने पळ काढला. अन्य वाहनेही जागच्या जागी थांबली. त्यामुळे काही वेळ या रस्त्यावरील वाहतुक खोळंबली. विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने विद्युत पुरवठा तातडीने खंडीत झाला. शिवाय ज्या वेळी विद्युत तारा जमिनीवर पडल्या त्यावेळी कोणीही त्या तारांखाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर काही वेळाने संबंधित तरूणांनी जवळ जाऊन मोटारसायकली घेतल्या. त्यानंतर ते निघून गेले. खोळंबलेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. या घटनेमुळे गर्दी जमल्याने कंटनेर चालकाची ‘पावती’ वाहतुक पोलिसांना फाडता आली नाही. त्यामुळे कंटनेर अकोल्याच्या दिशेने निघून गेला. वाहतुक पोलिसांच्या या ‘हिरोगिरी’ मुळे मात्र उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)