शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

सुशिक्षितांकडून नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:30 IST

बीड शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले असता वाहतूक नियम तोडण्यात सुशिक्षित वाहनधारकच अव्वल असल्याचे समोर आले. तर वाहनधारकांमध्ये दुचाकी आणि रिक्षा चालक सर्वाधिक नियम तोडतात. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. मोठे वाहनधारक मात्र, दुचाकी, रिक्षा चालकांच्या ‘ड्रायव्हिंग’ला घाबरून वाहने सावकाश चालवित असल्याचे दिसून आले.अरूंद रस्ते, अतिक्रमण यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. त्यातच रस्त्यावरील अस्ताव्यस्त वाहनांच्या पार्किंगने यात अधिकच भर पडली आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली आहे. यातच वाहनधारकही सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने वाहतूक समस्येवर मार्ग निघण्यास अडचणी येत आहेत. पोलीसही यावर हतबल झाले आहेत. याच मुद्याला धरून मंगळवारी शहरातील किती वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, याची पाहणी करण्यात आली. यामध्ये अशिक्षित वाहनधारक सावकाश वाहने चालवित होते. परंतु सूटाबुटातील, शर्टींग केलेले असे सुशिक्षित असणारे वाहनधारक मात्र वाहतूक नियम पाळण्यात पिछाडीवर आहेत.तसेच ट्रक, चार चाकी वाहनांपेक्षा रिक्षा व दुचाकीस्वार यांच्याकडून वाहतूक नियमांचे अधिक उल्लंघन होत आहे.बसचालकांना असते घाई...छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडून येणारी एक बस चक्क ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जात होती. विशेष म्हणजे दोन मोठी वाहने या रस्त्यावर बसत नाहीत. चालकाने बस रस्त्याच्या खाली उतरवली होती. वास्तविक पाहता एवढी वाहतूक कोंडी असतानाही बस चालक घाई करीत असल्याने अपघातास निमंत्रण मिळते.वाहतूक पोलीसही हतबलछत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर, आण्णाभाऊ साठे चौक, नगर नाका या भागात पाहणी केली असता वाहतूक नियम तोडणाºया वाहनधारकांना समजावून आणि त्यांना अडवून वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारीही हतबल झाले होते. एकावर कारवाई करेपर्यंत इतर दहा वाहनधारक नियम तोडून जात होते. यावेळी ज्याच्यावर कारवाई केली जात होती, तो इतरांकडे बोट दाखवितानाही दिसून आले. यामुळे पोलीस, वाहनधारकांत वादझाले.पोलिसांनी नेमले विशेष पथकवाहतूक सुरळीत करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी एक विशेष पथक नियूक्त केले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.