शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीनंतरही व्यापाऱ्यांची करचुकवेगिरी सुरूच; औरंगाबाद येथे जीएसटी विभागाच्या तपासणीत झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 13:45 IST

राज्य जीएसटी विभागाच्या पथकाने १ व २ डिसेंबर रोजी मालवाहू ट्रकची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देराज्य जीएसटी विभागाच्या पथकाची कारवाई १३ लाखांचा कर, दंड वसूल 

औरंगाबाद : जीएसटी (गुडस् अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स) लागू झाल्यानंतर व्यापारात होणाऱ्या करचुकवेगिरीला लगाम बसेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, जीएसटीतकरभरणा कमी झाल्याने केंद्र सरकारने ई-वे-बिलाची अंमलबजावणी सुरू केली; पण तरीही करचोरीचे प्रकार थांबत नसल्याचे दिसत आहे. नुकतेच राज्य जीएसटी विभागाने ई-वे-बिल न भरता मालवाहतूक करणाऱ्या १३ ट्रक जप्त केल्या आहेत व त्यांच्याकडून कर व दंडापोटी १३ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. 

करचुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात राज्य जीएसटी विभागाच्या पथकाने १ व २ डिसेंबर रोजी मालवाहू ट्रकची तपासणी करण्यात आली. दौलताबाद टी पॉइंट येथे मालट्रकच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्येक मालट्रकमधील सामान व ई-वे-बिलाची तपासणी केली जात होती. राज्यांतर्गत १ लाखांपेक्षा जास्त व आंतरराज्य मालवाहतुकीसाठी ५० हजारांपेक्षा जास्त किमतीच्या मालवाहतुकीसाठी जीएसटींतर्गत ‘ई-वे-बिल’ तयार करणे अति आवश्यक आहे. त्याची एक प्रत मालवाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरकडे असणे गरजेचे आहे.

मात्र, जीएसटी न भरता अजूनही बाजारपेठेत माल विक्री होत असल्याचे निदर्शनात येत आहे. हे पुन्हा एकदा जीएसटी विभागाच्या कारवाईने सिद्ध झाले आहे.  अधिकाऱ्यांना ई-वे-बिल न दाखविणारे १३ माल ट्रक जप्त करण्यात आले. लगेच करचुकवेगिरी करणाऱ्यांनी दंडासह १३ लाख रुपयांची रक्कम जमा केली. तपासणी पथकात राज्यकर उपायुक्त संतोष श्रीवास्तव, सहायक आयुक्त धनंजय देशमुख, तुषार गावंडे, माधव कुंभारवाड, संदीप नलावडे व राज्यकर निरीक्षकांचा समावेश होता. 

दररोज करावी लागेल तपासणी जीएसटी लागू होऊनही दीड वर्षाचा कालावधी उलटला; पण अजूनही करचुकवेगिरीचे प्रकार घडत आहेत. करचुकवेगिरी रोखण्यासाठी राज्य जीएसटी विभागाला दररोज मालट्रक चालकांकडील ई-वे-बिल तपासणी करावी लागेल. महिना, दोन महिन्यांनी तपासणी करून करचुकवेगिरी थांबणार नाही, असे करसल्लागारांनी नमूद केले. 

आॅक्टोबरमध्ये पहिली कारवाई दसरा-दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते. हे लक्षात घेऊन राज्य जीएसटी विभागाने जालाना मार्गावरील लाडगाव टोलनाका येथे दोन दिवस मालवाहतुकीची तपासणी केली होती. त्यात ‘ई-वे-बिल’ नियमाचे पालन न करणाऱ्या १५ मालट्रक मालकांवर कारवाई करण्यात आली होती. त्या सर्व मालट्रक जप्त करण्यात आल्या व सुमारे ६० लाख रुपयांची दंडासह कर वसुली करण्यात आली होती. 

टॅग्स :GSTजीएसटीTaxकरAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय