शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

औरंगाबादेतील पर्यटन स्थळे सुरक्षित असावीत!

By admin | Updated: August 25, 2014 00:23 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असुरक्षित आहेत,

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असुरक्षित आहेत, वाहनातून उतरताच जपानी भाषा बोलत विविध सामान खरेदी करण्याचा आग्रह धरणारे व्यापारी, रेल्वेस्टेशनवर उतरताच भिकाऱ्यांचा गराडा पाहून आश्चर्य वाटते. ही परिस्थिती बदलायला हवी. जगप्रसिद्ध अजिंठा- वेरूळ आमच्या देशात असते तर आम्ही खूप उत्साहाने त्याची जपणूक केली असती, असे मत जपानी नागरिकांच्या शिष्टमंडळाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. भारत- जपान मैत्री कार्यक्रमांतर्गत २५ आॅगस्ट २०१२ मध्ये शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. त्यानंतर औरंगाबाद सिटी मेगा क्लिनिंग ईव्हेंट आॅर्गनायझिंग कमिटीचे चैतन्य भंडारे आणि गिरीश मगरे यांच्या पुढाकाराने २५ आॅगस्ट रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी जपानहून खास सात स्वच्छता दूत शहरात दाखल झाले आहेत. उद्या आणखी दोन जण येणार आहेत. यामध्ये तोषिओ चिगुसा, सासाकी जिनसुके, एबीस्यू ताकाफुमी, आकितो साकाई, नाकामोतो युकारी, सावादा इत्सुकी, सुरुगा मेगुमी यांचा समावेश आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते पुढे म्हणाले की, जपानमध्ये आम्ही वेगवेगळ्या संघटनांसोबत स्वच्छतेचे काम करीत आहोत. सुरुवातीला आमच्याकडेही अशीच अवस्था होती; पण आता परिस्थिती खूपच बदलली आहे. औरंगाबादही स्वच्छ, सुंदर होईल. 1औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पाहायला आम्हाला आवडेल, बाजारपेठेत खरेदी-विक्रीचा व्यवहार कसा होतो, हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.2शिष्टमंडळातील काही सदस्यांनी या शहरात एक ते दोन वर्षे राहून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. कारण येथे कामाला खूप वाव आहे.3टपाल पेट्या स्वच्छ करण्याचा एका सदस्याला खूप छंद आहे. तो एका वाहनावर बसून शहरातील विविध टपालपेट्या साफ करणार आहे.4हीच पर्यटन स्थळे आमच्या देशात असती, तर कुठेच केरकचरा आढळला नसता. यापेक्षा आणखी कितीतरी जास्त सोयी- सुविधा दिसल्या असत्या.